शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

खळबळजनक! 'तिच्या' हत्येप्रकरणी 'तो' जेलमध्ये गेला अन् 9 वर्षांनी पत्नीला जिवंत पाहून हादरला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 19:27 IST

Crime News : विवाहित महिला बाजारात फिरताना आढळल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींना मोठा धक्काच बसला आहे.

नवी दिल्ली - बिहारच्या गयामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला 9 वर्षांपूर्वी बायकोच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पण आता तब्बल 9 वर्षांनी तीच पत्नी जिवंत आढळली आहे. संबंधित विवाहित महिला बाजारात फिरताना आढळल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींना मोठा धक्काच बसला आहे. त्य़ांच्या पायाखलची जमीनच सरकली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेतलं आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उषा कुमारी असं विवाहित महिलेचं नाव आहे. तर विजय कुमार असं शिक्षा झालेल्या पतीचं नाव आहे. विजय कुमार हे आपल्या पत्नीसह बिहारमधील गया शहरानजीक असणाऱ्या अबगिला येथे वास्तव्याला होते. त्यांची पत्नी उषा नऊ वर्षांपूर्वी अचानक गायब झाली होती. या प्रकरणी माहेरच्या मंडळींनी पती विजय कुमार, सासू आणि दिराविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पती विजयला तीन महिन्यांचा कारावास देखील झाला होता. 

सासूला उच्च न्यायालयातून जामीन घ्यावा लागला होता. हा खटला अद्याप न्यायालयात आहे. दीर रणजीत यांने दिलेल्या माहितीनुसार, 'एके दिवशी सायंकाळी आमची बहीण दूध आणण्यासाठी बाजारात गेली होती. यावेळी त्यांना नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली आपली वहिनी दिसली. वहिनीला असं जिवंत पाहून तिला धक्काच बसला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने घरी येऊन आम्हाला याची माहिती दिली. पत्नी जिवंत असल्याचं कळाल्यानंतर पती विजय आणि कुटुंबीय उषाच्या माहेरी गेले. 

उषाने त्यानंतर दुसरं लग्न करणार असल्याचं सांगत सासरी येण्यास नकार दिला. त्यानंतर विजयनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत उषाला ताब्यात घेतलं आहे. एखादी महिला सात वर्षे सापडली नाही, तर तिला मृत समजलं जातं. संबंधित महिला नऊ वर्षांनी परतल्याने तत्कालीन साक्षींच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. तसेच खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी माहेरकडील लोकांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी