शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संतापजनक! 3 लाख आणि कार दिली नाही म्हणून पतीने फोनवरच दिला पत्नीला ट्रिपल तलाक अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 12:49 IST

Crime News : हुंड्यात तीन लाख रुपये रोख आणि कारची मागणी पूर्ण न केल्याने पतीने मुंबईहून फोनवरून पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील महिलेला तिहेरी तलाक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हुंड्यात तीन लाख रुपये रोख आणि कारची मागणी पूर्ण न केल्याने पतीने मुंबईहून फोनवरून पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर या तरुणाने मुंबईतील एका हिंदू तरुणीशी लग्न केल्याचाही आरोप होत आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या 6 जणांवर अत्याचार आणि तिहेरी तलाकच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. 

फतेहपूरच्या गाझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शाखा गावामध्ये ही महिला राहते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, गाझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शाखा गावातील रहिवासी शरीफ खान यांची मुलगी रुक्सार हिचा निकाह 5 डिसेंबर 2018 रोजी गावातीलच रहिवासी रमजान खानसोबत झाला होता. रमजान मुंबईच्या शिवाजी नगरमध्ये कुटुंबासह राहतो. त्यानंतर पती, सासरा इदरिश खान, सासू सलमा, नणंद मुस्कान हे हुंड्याबाबत समाधानी नव्हते असा आरोप तिने केला आहे. 

सासरच्यांनी हुंड्यात तीन लाख रुपये रोख आणि कारची मागणी केली होती. मात्र रुक्सारच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ते हुंड्याची मागणी पूर्ण करू शकले नाहीत. या पीडित महिलेची अशी तक्रार आहे की, हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने नाराज झालेल्या तिच्या सासरच्या व्यक्तींनी महिलेला मारहाण करून तिचा छळ केला. गर्भवती असताना तिला घराबाहेर काढण्यात आलं अशी तक्रार रुक्सारने केली आहे. यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली. ही पीडित महिला एका मुलाची आई आहे.

रुक्सारच्या पतीने तिला फोनवर तिहेरी तलाक देऊन मुंबईतीलच रितू नावाच्या हिंदू मुलीशी लग्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिला रुक्सारच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम  498-A, 323, 504, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 चे कलम 3, 4 आणि मुस्लिम महिला विवाह कायदा, 2019 मधील कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक