शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Crime News: वाडा येथील विद्यार्थिनीचे अपहरण व सुटका, घटनेचा टीईटी परीक्षातील गैर प्रकाराशी संदर्भ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 22:28 IST

Crime News: वाडा येथील एका शिक्षक दाम्पत्याच्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर वाडा पोलिसांनी जवळच लपविलेल्या आरोपीला अवघ्या बारा तासात पकडण्यात यश मिळविले असले तरी ह्या मागे शिक्षक पात्र परीक्षेतील(टिईटी) गैरव्यवहाराचा संबंध जोडला जात आहे.

- हितेंन नाईकपालघर  - वाडा येथील एका शिक्षक दाम्पत्याच्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर वाडा पोलिसांनी जवळच लपविलेल्या आरोपीला अवघ्या बारा तासात पकडण्यात यश मिळविले असले तरी ह्या मागे शिक्षक पात्र परीक्षेतील(टिईटी) गैरव्यवहाराचा संबंध जोडला जात असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत रात्री १२ वाजता वाडा पोलीस ठाण्यात कश्यासाठी आल्या होत्या?ह्यावर जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे.

वाडा शहरात अशोक वन परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थीनीचे काल (12 ऑगस्ट रोजी) सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीतून आलेल्या तीन आरोपींनी अपहरण केल्याने एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी आपल्या टीम बनवून अनेक ठिकाणी सिसीटिव्ही फुटेज चा आधार घेत तपास केला असता वाडा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या ऐनशेत गावाजवळ आरोपीच्या एका शेतघराचा त्या विद्यार्थिनीची सुटका केली.याप्रकरणी आरोपी समीर ठाकरे ह्या क्लासेस घेणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला अटक केली आहे.

संध्याकाळी सात च्या दरम्यान हे प्रकरण घडल्या नंतर पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत ह्या रात्री ११ ते१२ च्या दरम्यान वाडा पोलीस स्थानकात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून जिल्ह्यातील एका शिक्षकाच्या मुलीचे अपहरण झाल्या नंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी वाडा पोलीस ठाण्यात जाण्या मागचे कारण मात्र अस्पष्ट आहे.ह्या बाबत शिक्षणाधिकारी भागवत ह्यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला पोलिसांनी चौकशी साठी बोलाविले होते का?असे विचारले असता मला चौकशी साठी पोलिसांनी बोलाविले नसल्याचे त्यांनी लोकमत ला सांगितले.मग रात्रीचे १२ वाजता त्यांनी वाडा पोलीस ठाण्यात जाण्या मागचे कारण काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ह्या अपहरण प्रकरणाचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा(टिईटी) मधील भ्रष्टाचाराचा थेट संबंध असून टिईटी परीक्षा उतिर्ण झालेला उमेदवारच शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरत असतो.ह्या टिई टी परीक्षेला बसलेल्या शेकडो उमेदवाराकडून लाखो रुपयांची रक्कम स्विकारण्यात आली असून त्याचा थेट संबंध जिप च्या शिक्षण विभागाशी जोडला जात आहे.त्यामुळे एका उच्च शिक्षित तरुणांनी एका मुलीचे केलेले अपहरण ही सत्य बाब असली तरी त्या मागचे खरे कारण शोधणे वाडा पोलिसांपुढे एक आव्हान ठरले आहे.कारण आरोपीने टिईटी च्या भ्रष्टाचाराचा अभ्यास करा सर्व सत्य बाहेर येईल अशी साद जिल्ह्यातील पत्रकारांना घातली असून हे अपहरण आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग ह्याचा कुठेतरी मोठा संबंध असल्याची दाट शक्यता वर्तवली जात असून शिक्षणाधिकाऱ्यांचे रात्री १२ वाजता वाडा पोलीस ठाण्यात जाणे  ह्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी