शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

"आता सहन होत नाही..."; पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, सुसाईड नोटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 19:29 IST

Crime News : पत्नीच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालंदा जिल्ह्यातील लाहिरी पोलीस स्टेशन हद्दीतील रामचंद्रपूर टीचर्स कॉलनीमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. चंद्रदेव कुमार असं व्यक्तीचं नाव आहे. चंद्रदेवच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्याकडून एक सुसाईड नोट जप्त केली आहे, ज्यामध्ये त्याने पत्नीचे दुसऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे. यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते.

वाद व छळाला कंटाळून चंद्रदेवने टोकाचं पाऊल उचललं. पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस अधिकारी सुबोध कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रदेवने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत. चंद्रदेव जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्येही त्याने याचा उल्लेख केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

चंद्रदेवने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, पत्नी तिच्या वर्गमित्रासह गेल्या शुक्रवारी घरातून पळून गेली. त्यानंतर तिने कोर्टात जाऊन लग्न केलं. त्यामुळे आता सहन होत नाही. चंद्रदेव रामचंद्रपूर बाजार समितीत बटाटे व कांद्याची विक्री करायचा. 2015 मध्ये छबीलापूर पोलीस ठाणे हद्दीतील वाढी गावात त्याचं लग्न झालं. लग्नानंतर दोन मुलं झाली. एक 6 वर्षांची मुलगी आणि 4 वर्षांचा मुलगा आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी