शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सैराटची पुनरावृत्ती! माहेरच्यांनी घरी जेवायला बोलावलं अन् भावाने उंबरठ्यावरच बहिणीला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 12:02 IST

Crime News : संतापलेल्या भावाने टोकाचं पाऊल उचललं. बहीण आणि तिच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली. तिला माहेच्यांनी जेवायला बोलावलं असतानाच घराच्या उंबरठ्यावरच भावाने दोघांना संपवलं आहे.

नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली असून सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने टोकाचं पाऊल उचललं. बहीण आणि तिच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली. तिला माहेच्यांनी जेवायला बोलावलं असतानाच घराच्या उंबरठ्यावरच भावाने दोघांना संपवलं आहे. य़ा घटनेने एकच खळबळ उडाली. लग्नाला असलेल्या विरोधातून नवदाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हा धक्कादायक प्रकार घ़डला आहे. 

अवघ्या पाच दिवसांपूर्वीचं या दोघांचं लग्न झालं होतं. कुटुंबाच्या विरोधानंतर तरुणीने पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर माहेरच्या मंडळींनी दोघांना घरी जेवायला बोलावलं आणि घराच्या उंबरठ्याबाहेरच त्यांची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन आणि सरण्या असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे. सरण्याचा भाऊ शक्तीवेल आणि त्याचा मित्र रणजीत यांनी हत्या केली. 

सरण्या नर्स म्हणून एका रुग्णालयात काम करत होती. त्या ठिकाणी मोहन देखील आपल्या एका नातेवाईकाला घेऊन आला होता. येथेच या दोघांची ओळख झाली. काही दिवसांनंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर हे प्रेमात झालं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. त्यांनी विरोध केल्यामुळे सरण्या आणि मोहनने पळून जाऊन लग्न केलं होतं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरण्याला माहेरी जेवायला बोलवण्यात आलं आणि त्याच वेळी तिची हत्या केली. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. शक्तीवेलने बहिणीला घरी जेवणासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. भाऊ आणि कुटुंबीयांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला, असा समज करुन सरण्या पतीसह माहेरी जेवायला गेली. त्याचवेळी उंबरठ्याजवळच शक्तीवेल आणि रणजीतने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी