शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Crime News: सतत मोबाईल वापरते म्हणून वडील रागावले, संतापलेल्या तरुणीने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 12:28 IST

Crime News: सतत मोबाईल पाहत असल्याच्या कारणावरून वडील १५ वर्षीय मुलीला रागावल्याने तिने मुळा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

अहमदनगर - सतत मोबाईल पाहत असल्याच्या कारणावरून वडील १५ वर्षीय मुलीला रागावल्याने तिने मुळा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे गुरुवारी ( दि. १४ ) सकाळी उघडकीस आली. अक्षदा विकास वाघ (रा. प्रभकरनगर, आंबी खालसा , ता. संगमनेर )असे या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , विकास वाघ हे आंबीखालसा परीसरातील प्रभाकरनगर येथे मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी अक्षदा ही गावातीलच शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती. अक्षदा ही सतत मोबाईलमध्ये बघत असल्याने बुधवारी रात्री तिचे वडील रागावले. याचा राग मनात धरत ती रात्री अकराच्या दरम्यान कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली.  परिसरात नातेवाईकांनी रात्रभर सदर मुलीचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजलेच्या दरम्यान (दि. १४) ग्रामस्थांना तिचा मृतदेह मुळा नदीपात्रात पुलाखाली आढळून आला.

सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच नाईक राजेंद्र लांघे , संतोष खैरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. एकनाथ बाळू शिंदे (रा. आंबी खालसा ता. संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर