शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' स्वत:लाच संपवलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 20:04 IST

Crime News : 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं आहे. 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. इटावामधील उसराहर भागात घडलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी आता तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर कलान येथील रहिवासी असलेल्या विक्रम सिंह यादवने कुटुंबाच्या विरोधात जाऊन 20 दिवसांपूर्वी आपल्या पसंतीच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. 12 मे रोजी मथुरामध्ये विक्रमचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीच्या मोठ्या बहिणीचे लग्न विक्रमच्या भावाशी झाले आहे. 

विक्रमचे वडील शिवराम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर विक्रम जेवण करून आपल्या खोलीत झोपला. त्यानंतर सकाळी त्याचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी विक्रमचा मृतदेह खाली आणला आणि नंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. 

पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. विक्रमच्या नातेवाईकांसोबतच पोलीस त्याच्या फोनचे डिटेल्सही पाहत आहेत. कौटुंबिक कलहातून विक्रमने जीव दिला की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी कुटुंबीयांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी पोलीस शेजारी आणि विक्रमच्या ओळखीचे आणि मित्रांचीही चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी