शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' स्वत:लाच संपवलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 20:04 IST

Crime News : 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं आहे. 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. इटावामधील उसराहर भागात घडलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी आता तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर कलान येथील रहिवासी असलेल्या विक्रम सिंह यादवने कुटुंबाच्या विरोधात जाऊन 20 दिवसांपूर्वी आपल्या पसंतीच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. 12 मे रोजी मथुरामध्ये विक्रमचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीच्या मोठ्या बहिणीचे लग्न विक्रमच्या भावाशी झाले आहे. 

विक्रमचे वडील शिवराम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर विक्रम जेवण करून आपल्या खोलीत झोपला. त्यानंतर सकाळी त्याचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी विक्रमचा मृतदेह खाली आणला आणि नंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. 

पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. विक्रमच्या नातेवाईकांसोबतच पोलीस त्याच्या फोनचे डिटेल्सही पाहत आहेत. कौटुंबिक कलहातून विक्रमने जीव दिला की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी कुटुंबीयांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी पोलीस शेजारी आणि विक्रमच्या ओळखीचे आणि मित्रांचीही चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी