शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' स्वत:लाच संपवलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 20:04 IST

Crime News : 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं आहे. 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. इटावामधील उसराहर भागात घडलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी आता तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर कलान येथील रहिवासी असलेल्या विक्रम सिंह यादवने कुटुंबाच्या विरोधात जाऊन 20 दिवसांपूर्वी आपल्या पसंतीच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. 12 मे रोजी मथुरामध्ये विक्रमचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीच्या मोठ्या बहिणीचे लग्न विक्रमच्या भावाशी झाले आहे. 

विक्रमचे वडील शिवराम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर विक्रम जेवण करून आपल्या खोलीत झोपला. त्यानंतर सकाळी त्याचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी विक्रमचा मृतदेह खाली आणला आणि नंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. 

पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. विक्रमच्या नातेवाईकांसोबतच पोलीस त्याच्या फोनचे डिटेल्सही पाहत आहेत. कौटुंबिक कलहातून विक्रमने जीव दिला की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी कुटुंबीयांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी पोलीस शेजारी आणि विक्रमच्या ओळखीचे आणि मित्रांचीही चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी