शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Court: भ्रष्टाचाराचे आरोप; एटीएस अधिकारी निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 02:59 IST

Court: उच्च न्यायालयाने मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. २०१० मध्ये भ्रष्टाचारप्रकरणी अटक होण्यापूर्वी त्यांनी मालेगावचे २००८ चे बॉम्बस्फोट प्रकरण, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण व  २००६ च्या रेल्वे स्फोट प्रकरणाचा तपास केला होता.

मुंबई : उच्च न्यायालयानेमुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. खानविलकर हे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) होते. २०१० मध्ये भ्रष्टाचारप्रकरणी अटक होण्यापूर्वी त्यांनी मालेगावचे २००८ चे बॉम्बस्फोट प्रकरण, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण व  २००६ च्या रेल्वे स्फोट प्रकरणाचा तपास केला होता.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, खानविलकर आणि अन्य दोघांनी २६ आणि २७ डिसेंबर २००९ च्या मध्यरात्री एटीएसच्या पथकाने मुंबईतील मुलुंड परिसरातील एका क्लबवर छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने लॉटरी व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीसह काही लोकांना ताब्यात घेतले आणि त्यांना एटीएसच्या काळाचौकी पोलीस ठाण्यात नेले. लॉटरी विक्रेत्याने याबाबत तक्रार दिली, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.

तक्रारदारावर प्राणघातक हल्ला करून प्रकरणातून सोडण्यासाठी पोलिसांनी २० लाखांची मागणी केली.  खानविलकर यांनी तक्रारदाराला इतर प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली, असा आरोप सरकारी वकिलांनी केला. तडजोडीनंतर खानविलकर यांनी १० लाख रुपये मागितले. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये द्यायची होती. 

२०१३ मध्ये सत्र न्यायालयाने खानविलकर यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली, तर त्यांच्या दोन साथीदारांना १० महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात खानविलकर व त्यांचे दोन साथीदार उच्च न्यायालयात गेले होते. खानविलकर यांनी लाच मागितल्याचा पुरावा खटल्यातून गायब आहे, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी  केला. त्यानंतर आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात सरकारी वकील अयशस्वी ठरले    असून, आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे न्या. अजय गडकरी यांच्या  खंडपीठाने सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयMumbaiमुंबई