शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus : मुंबईत २७ मार्चपासून पुन्हा जमावबंदी, पोलीस आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 20:02 IST

Coronavirus : सार्वजनिक ठिकाणी पंधरवडाभर जमावबंदी लागू

ठळक मुद्देगुडी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थोडी मोकळीक देण्यात आली असून शुक्रवारपासून पुन्हा जमावबंदी लागू केली जाणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३७ (३) अन्वये ही बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या पादूर्भावामुळे मुंबई शहर व उपनगरात जमाव बंदी करण्यात आलेली आहे. येत्या २७ मार्चपासून ते १० एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने एकत्रित फिरणाऱ्या, आंदोलन करणारे नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. गुडी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थोडी मोकळीक देण्यात आली असून शुक्रवारपासून पुन्हा जमावबंदी लागू केली जाणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

Coronavirus : ड्रोनसह इतर उड्डाणांवर महिनाभर बंदी

महानगरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जमावबंदी संबंधी नव्याने आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारकडून नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना वारंवार करण्यात येत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असून रेल्वे स्टेशन,बस स्थानकावर प्रवास्यांची गर्दी कायम आहे. त्यामुळे त्यांना प्रतिबंध घालून शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते १० एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत जमाव बंदी लागू केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३७ (३) अन्वये ही बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक प्रमाणात एकत्रित फिरणाऱ्या इसमांवर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तMumbaiमुंबई