शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Coronavirus : कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या कॉल सेंटरने ठाण्यात थाटला कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:39 IST

ठाणे पालिकेने हा प्रकार उघडकीस आणून मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे : कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शासनाने ते बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नवी मुंबईतील त्या कॉल सेंटरच्या मालकाने ते बंद न करता, त्यातील ४०० पेक्षा अधिक कर्मचारी ठाण्यात आणून पुन्हा व्यवसाय सुरू केल्याचा प्रकार उघड झाला आहे.ठाणे पालिकेने हा प्रकार उघडकीस आणून मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठाण्यातील ढोकाळी येथे ज्या इमारतीमध्ये या ४०० कर्मचाऱ्यांना आणले होते, तेथे त्यांना बंदिस्त करून त्यांची तपासणी केली. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. तपासणी केल्याशिवाय एकही कर्मचाºयाला या इमारतीच्या बाहेर जाऊ दिलेले नाही.ऐरोली येथील कॉल सेंटरच्या एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानंतर, या कंपनीने ऐरोली येथील सेंटर बंद करून येथील ४०० कर्मचाऱ्यांना ठाण्यातील ढोकाळी परिसरात शरदचंद्र पवार मिनी स्टेडियमच्या बाजूला इमारतीमध्ये स्थलांतरित केले. हे समजताच जिल्हाधिकारी महापालिका प्रशासनाला अ‍ॅलर्ट केले. त्यानंतर, गुरुवारी रात्री ११.३०च्या दरम्यान स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनीदेखील हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्या ठिकाणी धाव घेऊन पुन्हा नवी मुंबईत जाण्यास सांगितले. मात्र, याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. त्यानंतर, पालिकेचे आरोग्य पथक व पोलिसांनी तेथे जाऊन ४०० कर्मचाºयांना त्याच ठिकाणी बंदिस्त केले. त्यानंतर, त्यांची त्याच ठिकाणी तपासणी केली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.अद्याप गुन्हा दाखल नाहीकापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला. नवी मुंबईच्या ज्या कंपनीमधून हे कर्मचारी ठाण्यात आले होते, त्यांची तपासणी केली असून हे सर्व कर्मचारी निगेटिव्ह असल्याचे ते म्हणाले. यामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे