शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

CoronaVirus : मध्य प्रदेशातून पलायन केलेल्या 8 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:41 IST

CoronaVirus : कुसुमकोट बु. येथून आठ नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ठळक मुद्देमंगळवारी रात्री तणावाचे वातावरण : बुऱ्हाणपूर येथून परतले मुस्लिम बांधवांना पोलिसांनी मारहाण केल्याची चर्चा कानावर पडताच शहरातील मुस्लिम बांधवांनी वसतिगृहाकडे धाव घेतली.

धारणी (अमरावती) : तालुक्यातील कुसुमकोट बु. गावात मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर येथून पळून आलेले विशिष्ट समाजाचे आठ नागरिक त्यांच्या नातेवाइकाकडे थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मंगळवारी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुसुमकोट बु. गावात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, तगड्या पोलीस बंदोबस्तामुळे तणाव निवळला. रात्री १ वाजता धारणी येथील मुलींच्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले. 

प्राप्त माहितीनुसार, कुसुमकोट बु. गावात मध्य प्रदेशातून आलेले नातेवाईक स्थानिक विशिष्ट समाजातील रहिवाशांकडे आल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार धारणी पोलिसांनी मंगळवारी गावात चौकशी केली. आमच्याकडे कोणीच आलेले नसल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शोधमोहीम राबवून या आठ जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची माहिती लपविणाऱ्या दोन कुटुंबप्रमुखांनाही जेरबंद केले. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे, पोलीस निरीक्षक एल.के. मोहुंदळे, सहायक निरीक्षक अतुल तांबे, उपनिरीक्षक माया वैश्य, कर्मचारी अनिल झरेकर, अनुराग पाल, आकाशे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तगडा बंदोबस्त ठेवला.

सामान मशिदीमागे लपवूनमध्य प्रदेशातून आलेल्या या नागरिकांचे साहित्य गावातील मशिदमागे लपवून ठेवण्यात आले होते. ते नागरिकांनी हुडकून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी रात्री १ च्या सुमारास धारणी येथील मुलींच्या निवासी वसतिगृहात आणून ठेवले होते. 

दोन दिवसांपासून तळ ठोकून खंडवा, बऱ्हाणपूर येथून पळून कुसुमकोट येथे दोन दिवसांपासून तळ ठोकणारे सर्व जण वाठोडा शुक्लेश्वर (ता. भातकुली) येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांनी पोलिसांची दिशाभूल केली. अमरावती येथील मुस्लिम बांधवाचा इज्तेमानंतर त्यांना रीतिरिवाजानुसार बाहेरगावच्या मशिदीत पाठविण्यात आले होते. आम्ही सर्वच मशिदीचे नमाजी आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.  आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्लासदर मुस्लिम बांधवांना पोलिसांनी मारहाण केल्याची चर्चा कानावर पडताच शहरातील मुस्लिम बांधवांनी वसतिगृहाकडे धाव घेतली. तेथे पोलीस त्यांची चौकशी करत होते. स्थिती लक्षात येताच जामा मशिदीचे अध्यक्ष हाजी फहीम व सलीम खान यांनी त्यांना सत्य लपवू नका व आरोग्य तपासणी करून घ्या, असे सांगितले. शासन निश्चित कालावधीनंतर घरी सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

मध्य प्रदेशातून कुसुमकोट बु. गावात नागरिक पायी आले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी गावात तनाव निर्माण झाला होता. यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. ज्यांनी आसरा दिला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. - संजय काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावतीMosqueमशिदMadhya Pradeshमध्य प्रदेश