शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

नक्षल दहशतीच्या विरोधात काढली संविधान तिरंगा यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 20:51 IST

नागरिकांचा सहभाग : आलापल्लीवरून लाहेरीपर्यंत फिरला भलामोठा तिरंगा

ठळक मुद्देभल्यामोठ्या तिरंग्यासह निघालेल्या या यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच निरापराध्यांचे बळी घेऊन दहशत पसरविली जाते. यावेळी तिरंगा खांद्यावर घेऊन लोकबिरादरी शाळेचे विद्यार्थी सोबत होते.

भामरागड (गडचिरोली) : लोकशाही मार्गाने चालणारे सरकार आणि संविधानानुसार चालणाऱ्या व्यवहाराला विरोधी करत नक्षलवाद्यांकडून गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच निरापराध्यांचे बळी घेऊन दहशत पसरविली जाते. परंतु, त्याला न जुमानता लोकशाहीबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने जनसंघर्ष समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवार २६ जानेवरीला आलापल्ली ते भामरागड आणि पुढे छत्तीसगड सीमेकडील लाहेरीपर्यंत संविधान तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. भल्यामोठ्या तिरंग्यासह निघालेल्या या यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

जनसंघर्ष समिती नागपूरचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांच्यासह त्यांचे सहकारी कॅप्टन स्मिता गायकवाड, रितेश बडवाईक, डॉ.श्रुती आष्टनकर, उडान फाऊंडेशनचे रमेश दलाई, रवी नीलकुद्री, प्रशांत मित्रावार, तसेच जनसंघर्ष समितीचे सदस्य संदेश लोधी, पंकज दुर्वे, अभिशेक सावरकर, गोलू ठाकरे, बरखा बडवाईक, प्रशांत शेंडे, रोशन ताईकर, शैलेश बामुलकर, आयुष्य दुबे, नीलेश गोमिसे, आशिष चौधरी, अभिजीत डायघने, महेश ढोबळे, मारूती मज्जी आदी सहभागी झाले होते.

भामरगडला पोहोचताच नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तिरंगा खांद्यावर घेऊन लोकबिरादरी शाळेचे विद्यार्थी सोबत होते. येथील बाजार चौक येथे सकाळी ९ वाजता जनसंघर्ष समितीच्या वतीने नागरिकांच्या उपस्थितीत संविधान पुस्तिका व तिरंगा पूजन करण्यात आले. तसेच सामूहिक राष्ट्रगीत झाले. त्यानंतर संविधानाचे अधिकार व कर्तव्य याचे सामूहिक वाचन करून ही तिरंगा यात्रा लाहेरीकडे रवाना झाली.दरवर्षी घेणार कार्यक्रमदेशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक जण हुतात्मा झाले. पण गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही स्वातंत्र्य कोसो दूर असल्यासारखे भयावह चित्र आहे. नक्षलवादी चळवळीत देशाचे अतोनात नुकसान होत असताना आपण एक व्यक्ती म्हणून काहीही करू शकत नाही का? की फक्त शासकीय यंत्रणा, पोलिसांचेच ते काम आहे, असे म्हणून गप्प बसणार? देशाच्या सीमेवर व देशाअंतर्गत आपल्या जवानांसोबत कायम उभे आहोत याची जाणीव वेळोवेळी त्यांना करून देण्याच्या हेतूने भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात जाऊन तेथे तैनात सुरक्षा दल आणि स्थानिक रहिवाशांसोबत प्रजासत्ताक दिन व स्वतंत्र्य दिवस साजरा करणार असल्याचे जनसंघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीRepublic Dayप्रजासत्ताक दिनGadchiroliगडचिरोली