शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलांनीच केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 15:48 IST

लातूर जिल्ह्यातील घटना : दोघांवर गुन्हा ; गळा आवळून टाकले शेतात

बेलकुंड (जि. लातूर) : वडील दारू पिऊन घरात भांडण करुन आईला सतत मारहाण करीत असल्याचा राग मनात धरून शिंदाळावाडी (ता.औसा) येथील दोघा भावांनी वडिलांचा खून केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी कृष्णा मच्छिंद्र गरड  व त्याच्या भावावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, शिंदाळावाडी शिवारातील योगिता गरड यांच्या शेतात मच्छिंद्र काशीनाथ गरड (वय ४३) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला.  काही वेळानंतर याची चर्चा गावात सुरू झाली. या घटनेची माहिती भादा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मयताच्या गळ्याला व मानेवर, डोळ्यावर जखमा आढळून आल्या. सदर व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात मयताचे वडील काशिनाथ गरड यांच्या फिर्यादीवरून कृष्णा मच्छिंद्र गरड याच्यासह भावावर कलम ३०२, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर