शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

४ लेकरांच्या बापाने एकतर्फी प्रेमातून शेजारी महिलेची केली हत्या, वाचा ट्रिपल मर्डरचा थरारक घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 17:20 IST

पोलिसांनी हत्येप्रकरणी ज्याला अटक केली तो चार लेकरांचा पिता आहे. पोलिसांनुसार, आरोपीला महिलेसोबत प्रेम संबंध ठेवायचे होते, पण तिने त्यास नकार दिला होता.

छत्तीसगढच्या सरगुजामधील अंबिकापूरमध्ये एकाच परिवारातील तीन सदस्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी हैराण करणारा खुलासा केला आहे. पोलिसांनी दावा केला की, शेजाऱ्यानेच ट्रिपल मर्डर केला. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. गेल्या बुधवारी रात्री उशीरा महिलेसहीत एकाच परिवारातील ३ सदस्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी हत्येप्रकरणी ज्याला अटक केली तो चार लेकरांचा पिता आहे. पोलिसांनुसार, आरोपीला महिलेसोबत प्रेम संबंध ठेवायचे होते, पण तिने त्यास नकार दिला होता.

पोलिसांनी सांगितलं की, महिलेकडून प्रेम संबंध ठेवण्यास नकार मिळाल्याने शेजारी रागात होता. आरोपी रात्री उशीरा महिलेच्या घरात शिरला आणि महिलेचा गळा कापला. यावेळी महिलेच्या १० वर्षीय मुलाने आणि सासऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांचीही त्याने हत्या केली.

भजन सिदार याची पत्नी कलावती सिरदार(२७) हिचा मृतदेह गुरूवारी सकाळी आढळून आला. महिलेचा १० वर्षीय मुलगा चंद्रिकाचा मृतदेह घरापासून ५० मीटर अंतरावर रस्त्यावर आणि सासऱ्याचा मृतदेह तिथे थोड्या अंतरावर आढळून आला. महिला तिच्या मुलासोबत राहत होती. तर सासरा मेघूराम शेजारी राहत होता. मुलाच्या पोटावर चाकूने वार केले होते. तिघांचा गळाही कापण्यात आला होता. तिघांचेही मृतदेह आढळल्यावर गावात दहशत पसरली. (हे पण वाचा : शिक्षिकेवर बलात्कार करून विवस्त्र फोटो काढले; निवृत्त ACP असल्याचा दावा करत लैंगिक अत्याचार)

रक्ताच्या डागांवरून आरोपीला पकडलं

सूचना मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गावातील लोकांना विचारपूस केली. लोकांनी पोलिसांकडे अनैतिक संबंधाची शंका व्यक्त केली. अशात पोलिसांनी महिलेचा शेजारी अरविंद सिरदार याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर रक्ताचे डाग सापडले होते. गावातील लोकांकडून त्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने हत्या केल्याचं मान्य केलं.

आरोपीनं सांगितलं हत्येचं कारण

पोलिसांनुसार, आरोपी अरविंदने सांगितलं की, त्याला कलावतीसोबत प्रेम संबंध ठेवायचे होते. पण ती सतत नकार देत होती. अशात त्याने एका दुसऱ्या तरूणाला तिच्या घरी येताना पाहिलं तर तो भडकला. कलावतीच्या पतीचा मृत्यू आधीच झाला होता. गेल्या बुधवारी रात्री साधारण १२ वाजता अरविंद कलावतीच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजा उघडल्यावर कलावती जोरात ओरडली की, इतक्या रात्री का आला. तेव्हा अरविंदने कलावतीवर चाकूने वार केला. तिचे वाचण्याचा प्रयत्न केला तर चाकू तिच्या मुलाच्या पोटात लागला. त्यांचा आवाज ऐकून तिचा सासरा आला. त्याने तिघांची हत्या केली. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी