शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:06 IST

हे नवविवाहित जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाला सतत चिंता सतावत आहे. या दोघांच्या घरी सगळेच चिंतेत आहेत

खैरागड - छत्तीसगडच्या खैरागड गंडई जिल्ह्यात एक नवविवाहित जोडपे सासरी जाताना अचानक बेपत्ता झाले आहे. २८ वर्षीय नरेंद्र वर्मा आणि २५ वर्षीय ट्विंकल वर्मा यांचे अलीकडेच अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लग्न झाले होते. दोघेही १४ जून रोजी चकनार इथल्या मुलीच्या माहेरी निघाले होते. परंतु तिथे पोहचलेच नाही. नातेवाईकांनी १७ जून रोजी या दोघांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली. या दोघांचेही मोबाईल बंद आहेत त्यामुळे त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकत नाही. याबाबत पोलिसांनी मोबाईल फोन ट्रेस करणे सुरू केले आहे. ज्याठिकाणाहून ते बेपत्ता झालेत तिथेही सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याने कुटुंबाला मोठी चिंता सतावली आहे.

माहितीनुसार, १४ जून रोजी या दोघांसोबत अखेरचे बोलणे झाले होते. तेव्हापासून दोघांचा नंबर बंद आहे. काहीच संपर्क नाही. ट्विंकलचे वडील चतुर्भुज जंघेल यांनी म्हटलं की, ते दोघे घरी पोहचल्यावर फोन करतील असं आम्हाला वाटत होते परंतु खूप तास झाले तरी त्यांचा फोन आला नाही त्यामुळे चिंता लागली. तर १७ जून रोजी छुईखदान पोलीस स्टेशनला बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली आहे असं नरेंद्रच्या वडिलांनी सांगितले. या दोघांचे मोबाईल पोलिसांकडून ट्रेस केले जात आहेत. 

हे नवविवाहित जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाला सतत चिंता सतावत आहे. या दोघांच्या घरी सगळेच चिंतेत आहेत. नरेंद्र आणि ट्विंकल यांच्या लग्नाला आता काहीच दिवस झालेत. त्यानंतर हा त्यांचा पहिला प्रवास होता. अखेर १४ जूनला काय झाले, ते एखाद्या अडचणीत सापडलेत का की अन्य काही कट आहे हे प्रश्न कुटुंबाला सतावू लागले आहेत. सध्या पोलीस प्रत्येक अँगलने या घटनेचा तपास करत आहे परंतु अद्याप कुठलाही ठोस पुरावा हाती लागला नाही. 

सोनम-राजा प्रकरणानं दहशत

मागील काही दिवसांपासून देशात सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरण सतत चर्चेत आहे. या प्रकरणात सोनम-राजा लग्नानंतर काही दिवसांत हनीमूनसाठी मेघालयला गेले होते परंतु २३ मे पासून हे जोडपे अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जूनच्या आसपास राजा रघुवंशी याचा मृतदेह एका खोल दरीत सापडला होता. त्यानंतर या प्रकरणी सोनम रघुवंशीने सरेंडर करताच सगळा प्रकार उघडकीस आला. सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून राजा रघुवंशीची हत्या केल्याचे समोर आले. राजाची हत्या करण्यासाठी सोनम आणि राजने तीन मित्रांना सुपारी दिली होती. त्यानंतर मेघालयात राजा रघुवंशीला एकटे गाठून सोनम आणि तिघांनी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून ते फरार झाले. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे येत आहेत. त्यातच छत्तीसगडमधील हे नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याने अनेकांच्या मनात दहशत पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं