शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:06 IST

हे नवविवाहित जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाला सतत चिंता सतावत आहे. या दोघांच्या घरी सगळेच चिंतेत आहेत

खैरागड - छत्तीसगडच्या खैरागड गंडई जिल्ह्यात एक नवविवाहित जोडपे सासरी जाताना अचानक बेपत्ता झाले आहे. २८ वर्षीय नरेंद्र वर्मा आणि २५ वर्षीय ट्विंकल वर्मा यांचे अलीकडेच अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लग्न झाले होते. दोघेही १४ जून रोजी चकनार इथल्या मुलीच्या माहेरी निघाले होते. परंतु तिथे पोहचलेच नाही. नातेवाईकांनी १७ जून रोजी या दोघांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली. या दोघांचेही मोबाईल बंद आहेत त्यामुळे त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकत नाही. याबाबत पोलिसांनी मोबाईल फोन ट्रेस करणे सुरू केले आहे. ज्याठिकाणाहून ते बेपत्ता झालेत तिथेही सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याने कुटुंबाला मोठी चिंता सतावली आहे.

माहितीनुसार, १४ जून रोजी या दोघांसोबत अखेरचे बोलणे झाले होते. तेव्हापासून दोघांचा नंबर बंद आहे. काहीच संपर्क नाही. ट्विंकलचे वडील चतुर्भुज जंघेल यांनी म्हटलं की, ते दोघे घरी पोहचल्यावर फोन करतील असं आम्हाला वाटत होते परंतु खूप तास झाले तरी त्यांचा फोन आला नाही त्यामुळे चिंता लागली. तर १७ जून रोजी छुईखदान पोलीस स्टेशनला बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली आहे असं नरेंद्रच्या वडिलांनी सांगितले. या दोघांचे मोबाईल पोलिसांकडून ट्रेस केले जात आहेत. 

हे नवविवाहित जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाला सतत चिंता सतावत आहे. या दोघांच्या घरी सगळेच चिंतेत आहेत. नरेंद्र आणि ट्विंकल यांच्या लग्नाला आता काहीच दिवस झालेत. त्यानंतर हा त्यांचा पहिला प्रवास होता. अखेर १४ जूनला काय झाले, ते एखाद्या अडचणीत सापडलेत का की अन्य काही कट आहे हे प्रश्न कुटुंबाला सतावू लागले आहेत. सध्या पोलीस प्रत्येक अँगलने या घटनेचा तपास करत आहे परंतु अद्याप कुठलाही ठोस पुरावा हाती लागला नाही. 

सोनम-राजा प्रकरणानं दहशत

मागील काही दिवसांपासून देशात सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरण सतत चर्चेत आहे. या प्रकरणात सोनम-राजा लग्नानंतर काही दिवसांत हनीमूनसाठी मेघालयला गेले होते परंतु २३ मे पासून हे जोडपे अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जूनच्या आसपास राजा रघुवंशी याचा मृतदेह एका खोल दरीत सापडला होता. त्यानंतर या प्रकरणी सोनम रघुवंशीने सरेंडर करताच सगळा प्रकार उघडकीस आला. सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून राजा रघुवंशीची हत्या केल्याचे समोर आले. राजाची हत्या करण्यासाठी सोनम आणि राजने तीन मित्रांना सुपारी दिली होती. त्यानंतर मेघालयात राजा रघुवंशीला एकटे गाठून सोनम आणि तिघांनी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून ते फरार झाले. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे येत आहेत. त्यातच छत्तीसगडमधील हे नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याने अनेकांच्या मनात दहशत पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं