शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका; १५ शहरांत हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 22:36 IST

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होऊ शकतो दहशतवादी हल्ला 

ठळक मुद्दे विशेषतः नवी दिल्लीतील लाल किल्ला मुख्यत्वेकरून दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी मिळाली आहे.दहशतवादी आयईडी, सरकारी गाडी किंवा गणवेश याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. 

मुंबई - नरेंद्र मोदी सरकारने कलम ३७० हटवल्याने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठ्या शहरात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. विशेषतः नवी दिल्लीतील लाल किल्ला मुख्यत्वेकरून दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी मिळाली आहे. याठिकाणी दहशतवादी आयईडी, सरकारी गाडी किंवा गणवेश याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह नवी दिल्ली आणि इतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

उद्या १२ ऑगस्टला बकरी ईद आणि त्यानंतर १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असे देशात दोन मोठे सण आहेत. याच पार्श्वभूमीवर हा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे तपास यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर देशातील १५ मोठ्या शहरांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कलम ३७० हटवल्याने काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील शहरे ही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता पसरली आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि सर्व परिस्थितीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काश्मीर दौऱ्यावर आहेत. आयबीच्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राजधानी दिल्लीत 'जैश - ए- मोहम्मद' ही दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. या बाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाRed Fortलाल किल्लाterroristदहशतवादीMumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्ली