शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नागपुरात चंद्रपूरच्या मद्यतस्करांची टोळी जेरबंद : विदेशी मद्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:58 IST

विदेशी दारूची मोठी खेप घेऊन चंद्रपूरकडे निघालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यतस्करांची टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री जेरबंद केली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी दारूची मोठी खेप घेऊन चंद्रपूरकडे निघालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यतस्करांची टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री जेरबंद केली. या टोळीत सात मद्यतस्करांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या तब्बल ८६३ बाटल्या जप्त केल्या.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यापासून नागपूर-चंद्रपुरातील मद्यतस्कर मिळेल त्या मार्गाने दारूची तस्करी करतात. त्यासाठी अल्पवयीन मुलांपासून तर महिला मजुरांपर्यंतचा मद्यतस्कर वापर करून करून घेतात. वेगवेगळ्या वाहनांचाही वापर करतात. खासगी वाहने, ट्रक, मेटॅडोरपासून तो छोट्या वाहनांपर्यंत सर्वच वाहनांचा तस्कर नागपुरातून चंद्रपुरात मद्य नेण्यासाठी उपयोग करतात. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह ठिकठिकाणचे पोलीस वाहनांवर नजर ठेवून असल्याचे लक्षात आल्याने निर्ढावलेले आरोपी स्वत:च रेल्वेने मद्य नेतात. बुधवारी असेच काही मद्यतस्कर दारूची मोठी खेप चंद्रपुरात नेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. त्यावरून या पथकाने सीताबर्डी टेकडी गणेश मंदिर पुलाच्या खाली सापळा लावला. बुधवारी रात्री १०. ३० च्या सुमारास एका पाठोपाठ काहीजण संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग केला आणि तब्बल सात जणांना ताब्यात घेतले.त्यांच्या जवळच्या साहित्याची पोलिसांनी तपासणी केली असता पाचपन्नास नव्हे तर तब्बल ८६३ दारूच्या बाटल्या पोलिसांना आढळल्या. ज्यात ब्लेंडर प्राईड, आॅफिसर चॉईस, मॅकडॉल नंबर -१ सारख्या विदेशी ब्रॅण्डच्या मद्याचा समावेश आहे. पोलिसांनी हा दारूसाठा जप्त केला. आरोपींकडून पोलिसांनी ६ मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण २ लाख, ४ हजार, ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम, एएसआय नागोराव इंगळे, हवलदार सुधाकर धंदर, कृपाशंकर शुक्ला, देवेंद्र चव्हाण, अजय रोडे, नायक बबन राऊत, आशिष क्षीरसागर यांनी ही कामगिरी बजावली.अटकेतील मद्यतस्करशाहरूख खान, हरीश ऊर्फ पिंटू श्रावण उईके, सूरज हरिप्रसाद सूर्यवंशी, भूषण दीपक पासफूलकर, अजय दीपक जाधव, सुनील रामजी मंडल आणि आशिष पुरुषोत्तम नारनवरे अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत. हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे रहिवासी आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीSmugglingतस्करीArrestअटक