शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Chandrapur: चंद्रपूरच्या घटनेमागे ३० वर्षांपूर्वीच्या बुरसटलेपणाची कहाणी; आंध्रप्रदेश कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 09:31 IST

भानामतीच्या संशयावरून मारहाण. अंगात कथित भानामती संचारलेल्या महिलांना पोलिसांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठविले. गरज भासल्यास त्यांना अटक करण्यात येणार असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भानामतीच्या संशयावरून महिला - वृद्धांना मारहाण प्रकरणाला ३० वर्षांपूर्वीची पार्श्वभूमी असल्याची बाब पुढे आली आहे. मारहाण झालेल्या सात जणांपैकी एका वृद्धाला ३० वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील एका गावातून करणी करण्याच्या अंधश्रद्धेतून बहिष्कृत केले गेले होते. त्यानंतर वणी खुर्द येथील नातेवाईकांनी तेथे जाऊन त्या वृद्धाला लपूनछपून गावाला आणले होते. तसेच मारहाण झालेल्यांपैकी शांताबाई कांबळे यांना सुमारे १५ वर्षांपूर्वी केकेझरी येथून गावकऱ्यांनी अशाच बुरसटलेपणातून गावाबाहेर काढले होते. त्यासुद्धा वणी खुर्द येथे वास्तव्यास आल्या. ही बाब गावकऱ्यांना माहिती होती. त्यामुळे कथित अंगात संचारणाऱ्या महिलांनी जेव्हा त्यांची नावे घेतली, तेव्हा जमावानेही मागचा-पुढचा विचार केला नाही.

अंगात कथित भानामती संचारलेल्या महिलांना पोलिसांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठविले. गरज भासल्यास त्यांना अटक करण्यात येणार असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे पोलिसांची छोटीशी चूकही अंगलट येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन जिवती, टेकामांडवा, पाटण व गडचांदूर येथून अधिकची पोलीस कुमक मागवण्यात आली होती.गावात सोमवारी तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांचा कडक बंदोबस्त असून बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला गावात जाण्यापासून रोखण्यात येत आहे.

हे आहेत आरोपी सुग्रीव शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, दादाराव कोटंबे, बालाजी कांबळे, अमोल शिंदे, गोविंद येरेकर, केशव कांबळे, सूरज कांबळे, संतोष पंचाल, माधव तेलंग, दत्ता भालेराव व सिद्धेश्वर शिंदे (सर्व रा. वणी खुर्द). आरोपींविरुद्ध १४३, १४७, १४९, ३२५, ३४२ आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये काही जण दलित असल्याने ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला नसल्याचे नायक यांनी सांगितले.

चंद्रपुरातून वाहन नेलेकायद्यानुसार आरोपीला न्यायालयात नेताना प्रत्येकासोबत एक व्यक्ती असायला हवी. ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूरहून ४० सीटर वाहन नेण्यात आले. जिवती हे दुर्गम भागात असून, अनेक अडचणींचा सामना करीत आरोपींना सुमारे ४५ किमी अंतरावरील राजुरा येथील न्यायालयात आणले.

आरोपी झालेे फरारचंद्रपूर येथून अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल दहागावकर, धनंजय तावाडे यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी गावकऱ्यांचे ब्रेनवाॅश करीत या प्रकारामागील वस्तुस्थिती मांडली. ही बाब काही जणांना पटली. यानंतर काही जण तक्रार देण्यास पुढे येताच पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. 

टॅग्स :Policeपोलिस