शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 13:40 IST

चंदन वर्माच्या व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

अमेठीच्या शिवरतनगंज भागात पती, पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी आरोपी चंदन वर्माचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत. याच दरम्यान, चंदन वर्माच्या व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. चंदनने स्टेटसमध्ये लिहिलं होतं की, "आज ५ लोक मरणार आहेत, मी तुम्हाला लवकरच दाखवतो."

असं सांगितलं जात आहे की, गुन्हा केल्यानंतर चंदन वर्माला स्वत:वरही गोळी झाडायची होती, कदाचित त्यामुळेच त्याने आपल्या स्टेटसवर ५ जणांना मारणार असल्याचं लिहिलं होतं. सध्या पोलीस चंदनच्या शोधात छापे टाकत आहेत. रायबरेली आणि अमेठी पोलिसांची संयुक्त पथके छापेमारी करत आहेत.

आतापर्यंतच्या तपासात या हत्या प्रकरणात नाव असलेला रायबरेली येथील रहिवासी चंदन वर्मा याने शिक्षक आणि त्याच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. चंदन एकटाच बुलेट घेऊन शिक्षक सुनील कुमार यांच्या वस्तीत पोहोचला होता. त्यानंतर त्याने घटनास्थळापासून सुमारे २० मीटर अंतरावर बुलेट पार्क केली आणि घराच्या आत गेला.

चंदन वर्माने चार जणांची हत्या करताना अनेक राऊंड गोळ्या झाडल्या होत्या, ज्यांचे शेल घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, शिक्षकाला एक गोळी लागली, तर पत्नीला दोन गोळ्या लागल्या. त्याचवेळी प्रत्येकी एक गोळी मुलींना लागली.

काही दिवसांपूर्वी सुनील कुमारची पत्नी पूनम भारती हिने रायबरेलीमध्ये चंदन वर्मा यांच्या विरोधात विनयभंग, मारहाण आणि एससी-एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी चंदन वर्माला अटक करून तुरुंगात पाठवले. आता सुनील कुमार आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालण्यात आल्याने पोलीस या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

चंदन हा रायबरेलीच्या तिलिया कोट परिसरात भाड्याने राहत होता. ज्या दिवशी सुनीलची पत्नी पूनम हिने चंदनवर आरोप केले त्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली. पूनम भारती हिने चंदनवर आरोप केला होता की, १८ ऑगस्ट रोजी ती आपल्या मुलांसाठी औषधं आणण्यासाठी गेली होती. यादरम्यान चंदनने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि तिने विरोध केला असता चंदनने तिला आणि तिच्या पतीला मारहाण केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश