शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

गटारात रसायन सोडणारा टँकर चालक, मालक, कारखानदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 18:48 IST

Crime News : महापालिका उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारी वरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देअखेर महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार टँकर चालक, मालक व ज्या कंपनीतून घातक रसायन आणले.

सदानंद नाईक

उल्हासनगर : संच्युरी रेयॉन कंपनीच्या सी साईज कंपनीच्या प्रवेशद्वार समोरील नाल्यात घातक रसायन सोडणाऱ्या टँकरला कंपनी सुरक्षा रक्षकांनी पकडला. टँकर चालक पळून जाण्यात यशस्वी झाला असून महापालिका उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारी वरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगर संच्युरी रेयॉन कंपनीच्या सी साईज प्रवेशद्वार समोर एक टँकर दोन दिवसांपूर्वी उभा होता. टँकर व शेजारील गटारातून दुर्गंधी येत असल्याने, कंपनी सुरक्षरक्षकांनी चौकशी केली. तेंव्हा टँकरचा चालक पळून जाण्याचा यशस्वी झाला. टँकर व गटारातून दुर्गंधी येत असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला दिली. कंपनीने उल्हासनगर पोलीस ठाण्याला माहिती देऊन टँकर ताब्यात घेण्याचे सांगितले. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने, स्थानिक नागरिकांत असंतोष निर्माण झाला. अखेर महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार टँकर चालक, मालक व ज्या कंपनीतून घातक रसायन आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात व अन्य गटारीत घातक रसायन सोडल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या आठवड्यात कैलास कॉलनी, भरतनगर परिसरात नदी पात्रातील उग्र दर्पमुळे शेकडो नागरिकांना डोळे चुरचुरने, डोके दुखी, दम, श्वास लागणे आदी त्रास झाल्याने, नागरिक रस्त्यावर आली. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केल्यावर, प्रदूषण मंडळ अधिकारी, महापालिका अधिकारी व पोलिसांनी दोन रात्री जागून काढून नदी किनारी वॉच ठेवला. मात्र हाती काहीच लागले नाही. स्थानिक नागरिकांसह नगरसेवकांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली होती. प्रदूषण मंडळांनी आनंदनगर एमआयडीसी मधील एका कंपनीला नोटीस पाठविले असून नदीचे पाणी अद्यापही रंगहीन आहे. दर पाच मिनिटांनी नदीचे पाणी रंग बदलत असल्याने नदी किनारील कंपनीच्या चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.नदीत रसायन सोडणारे रॅकेटशहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात वर्षानुवर्षे इतर ठिकाणाहून टँकरने आणलेले घातक व विषारी रसायन टाकले जाते. रसायन टाकताच किनारील परिसरात उग्र दर्पमुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊन, डोके दुखी, डोळे चुरचुरने, उलट्या आदी त्रास होतो. नदी पात्रात टँकरने इतर ठिकाणाहून आणलेले रसायन टाकण्यात येत असून त्यांचे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Policeपोलिसulhasnagarउल्हासनगर