शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

गटारात रसायन सोडणारा टँकर चालक, मालक, कारखानदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 18:48 IST

Crime News : महापालिका उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारी वरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देअखेर महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार टँकर चालक, मालक व ज्या कंपनीतून घातक रसायन आणले.

सदानंद नाईक

उल्हासनगर : संच्युरी रेयॉन कंपनीच्या सी साईज कंपनीच्या प्रवेशद्वार समोरील नाल्यात घातक रसायन सोडणाऱ्या टँकरला कंपनी सुरक्षा रक्षकांनी पकडला. टँकर चालक पळून जाण्यात यशस्वी झाला असून महापालिका उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारी वरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगर संच्युरी रेयॉन कंपनीच्या सी साईज प्रवेशद्वार समोर एक टँकर दोन दिवसांपूर्वी उभा होता. टँकर व शेजारील गटारातून दुर्गंधी येत असल्याने, कंपनी सुरक्षरक्षकांनी चौकशी केली. तेंव्हा टँकरचा चालक पळून जाण्याचा यशस्वी झाला. टँकर व गटारातून दुर्गंधी येत असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला दिली. कंपनीने उल्हासनगर पोलीस ठाण्याला माहिती देऊन टँकर ताब्यात घेण्याचे सांगितले. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने, स्थानिक नागरिकांत असंतोष निर्माण झाला. अखेर महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार टँकर चालक, मालक व ज्या कंपनीतून घातक रसायन आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात व अन्य गटारीत घातक रसायन सोडल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या आठवड्यात कैलास कॉलनी, भरतनगर परिसरात नदी पात्रातील उग्र दर्पमुळे शेकडो नागरिकांना डोळे चुरचुरने, डोके दुखी, दम, श्वास लागणे आदी त्रास झाल्याने, नागरिक रस्त्यावर आली. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केल्यावर, प्रदूषण मंडळ अधिकारी, महापालिका अधिकारी व पोलिसांनी दोन रात्री जागून काढून नदी किनारी वॉच ठेवला. मात्र हाती काहीच लागले नाही. स्थानिक नागरिकांसह नगरसेवकांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली होती. प्रदूषण मंडळांनी आनंदनगर एमआयडीसी मधील एका कंपनीला नोटीस पाठविले असून नदीचे पाणी अद्यापही रंगहीन आहे. दर पाच मिनिटांनी नदीचे पाणी रंग बदलत असल्याने नदी किनारील कंपनीच्या चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.नदीत रसायन सोडणारे रॅकेटशहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात वर्षानुवर्षे इतर ठिकाणाहून टँकरने आणलेले घातक व विषारी रसायन टाकले जाते. रसायन टाकताच किनारील परिसरात उग्र दर्पमुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊन, डोके दुखी, डोळे चुरचुरने, उलट्या आदी त्रास होतो. नदी पात्रात टँकरने इतर ठिकाणाहून आणलेले रसायन टाकण्यात येत असून त्यांचे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Policeपोलिसulhasnagarउल्हासनगर