शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

हृदयद्रावक! मोठ्या मुलाची मृत्यूशी झुंज; आई-वडील भीषण अपघातात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 21:31 IST

car accident: शहरातील युवा उद्योजक म्हणून ओळख असणारे विजय खंडारे सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमी सहभागी होत असत. सोमवारी दिवसभर त्यांनी दुकानातील व्यवहार केले. भेटलेल्या अनेक व्यक्तींशी चर्चा केली. यानंतर काही तासांत अपघातात कुटुंब उद्ध्वस्त झाले.

दर्यापूर (अमरावती) : भरधाव कार अपघातग्रस्त होऊन एका दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्या दाम्पत्याचा १६ वर्षीय मुलगा व चालक गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास दर्यापूर-अकोला मार्गावरील तोंगलाबाद-सौंदळी फाटा मार्गावर हा अपघात घडला. विजय खंडारे (४८) व वृषाली विजय खंडारे (४५, रा. जागृती कॉलनी, बनोसा, दर्यापूर) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. खंडारे हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते.     

अपघातात गंभीर जखमी झालेला पार्थ विजय खंडारे (१६), वाहनचालक मंगेश घोडस्कर (३८, रा. दर्यापूर) यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. मात्र, खंडारे यांच्या कारची अवस्था पाहता, त्यांचे वाहन समोरच्या एखाद्या मोठ्या वाहनावर मागून आदळले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

शहरातील दिलीप एजन्सीचे संचालक असलेले विजय खंडारे हे पत्नी आणि पार्थ आणि अंशु (५) या दोन मुलांसह सोमवारी रात्री ११ च्या सुमारास अहमदनगरजवळ मंगळवारी होणाऱ्या महानुभावपंथीयांच्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एमएच २७ एआर ८२५९ क्रमांकाच्या कारने दर्यापूरहून निघाले होते. दर्यापूरहून १२ किलोमीटर अंतरावरील तोंगलाबाद-सौंदळी फाट्यानजीक त्यांची कार अपघातग्रस्त झाली. यात मागील सीटवर बसलेल्या खंडारे दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने अकोल्याला हलविण्यात आले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

कुटुंब उद्ध्वस्त

शहरातील युवा उद्योजक म्हणून ओळख असणारे विजय खंडारे सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमी सहभागी होत असत. सोमवारी दिवसभर त्यांनी दुकानातील व्यवहार केले. भेटलेल्या अनेक व्यक्तींशी चर्चा केली. यानंतर काही तासांत अपघातात कुटुंब उद्ध्वस्त झाले.

पार्थची मृत्यूशी झुंज

अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला विजय खंडारे यांचा मोठा मुलगा पार्थ हा मृत्यूशी झुंज देत आहे. पाच वर्षांचा अंशु हा नातेवाइकांना ‘आई बाबा कुठे गेले? मला त्यांच्याजवळ जायचे आहे’, असा आग्रह धरत आहे. तुझे आईबाबा आता दूरच्या प्रवासाला निघून गेलेत, ते आता नाही परतणार, हे त्या अबोध चिमुकल्याला सांगायचे तरी कसे, अशी शोकविव्हळ परिस्थिती आप्तांवर येऊन ठेपली आहे.

टॅग्स :Accidentअपघात