शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कसाबला जिवंत पकडणे पोलिसांची सर्वोच्च कामगिरी : रमेश महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 20:11 IST

कसाब प्रकरणाने आपली न्यायव्यवस्था किती सक्षम आहे, हे जगाला दाखवून दिले.

औरंगाबाद : जगात जेवढे काही दहशतवादी हल्ले झालेत त्यात दहशतवादी जिवंत पकडला गेला नाही. मात्र, २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यात अवघ्या पावणेतीन तासांत दहशतवादी कसाबला जिवंत पकडण्यात मुंबईपोलिसांना यश आले. ही मुंबई पोलिसांची आजपर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे, असे या प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी व निवृत्त पोलीस निरीक्षक रमेश महाले यांनी येथे सांगितले. 

विवेक विचार मंचतर्फे संविधान दिनानिमित्त समाजजागृती मेळावा व ‘२६/११ दहशतवादी हल्ला : कसाब आणि तपास’ या व्याख्यानाचे आयोजन केले होते. भानुदासराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश प्रमोद आंबेकर होते. रमेश महाले यांनी ओघवत्या व सोप्या शैलीत २६/११ चा संपूर्ण घटनाक्रम व त्यानंतरचा तपास व कसाबला फाशीची शिक्षा होईपर्यंतची तपशीलवार माहिती दिली. भारतात आजपर्यंत जेवढे पाकिस्तान पुरस्कृत हल्ले झाले ते हल्ले त्यांच्या देशातील दहशवाद्यांनी केल्याचे पाकिस्तानने कधीच मान्य केले नाही; पण कसाबचे आम्ही एवढे पुरावे दिले की, अडीच महिन्यांनंतर पाकिस्तानने कसाब त्यांच्यात देशातील आहे, हे पहिल्यांदा मान्य केले. कसाब प्रकरणाने आपली न्यायव्यवस्था किती सक्षम आहे, हे जगाला दाखवून दिले. २,२०० साक्षीदार होते. त्यातील ६५८ साक्षीदारांची तपासणी झाली. एकही साक्षीदार फुटला नाही, हे उल्लेखनीय. यात कसाब एकटा नव्हता, तर लष्कर- ए-तोयबा, पाकिस्तान मिलिटरी व आयएसआय या तिघांच्या सहभागाने २६/११ चा हल्ला झाला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी कसाबला असे पकडून ठेवले की, त्यास जागचे हालू दिले नाही. यात ओंबळे शहीद झाले.  

मुंबई पोलीस तपास यंत्रणेतील ९८ लोकांनी एकही दिवस सुटी न घेता सलग ९० दिवसांत ११,३५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. दहशतवादी हल्ल्यात १५५ कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान झाले. दहशतवाद्यांकडील २३३ वस्तूंपैकी १५० वस्तू  ‘मेड इन पाकिस्तान’ होत्या. या तपासाशी निगडित अशा अनेक बाबींविषयी महाले यांनी माहिती दिली. दहशतवादी डेव्हिड हेडली याने मुंबईची रेकी करून पाकिस्तानाला माहिती दिली होती की, २६ नोव्हेंबर २००८ रोजी भारत- इंग्लंड क्रिकेट मॅच आहे. त्यादिवशी बोरीबंदरावर अत्यंत कमी लोक असतील. ती वेळ दहशतवाद्यांना बंदरावर उतरण्यास सुरक्षित राहील. यामुळे दहशतवाद्यांनी तो दिवस निवडल्याचे महाले म्हणाले.

घटनादुरुस्ती करताना सर्वांनी सजग राहावे - माजी जिल्हा न्यायाधीश प्रमोद आंबेकर यांनी सांगितले की, सत्ताधारी राजकीय पक्ष बहुसंख्येच्या बळावर राज्यघटना दुरुस्ती करत असतात.राजकीय फायद्यासाठी घटनादुरुस्ती करता येत नाही. हा राज्यघटनेवरील हल्लाच होय. राज्यघटना दुरुस्ती करताना मूळ गाभ्यात बदल करू नये, यासाठी सर्व जनतेने सजग राहणे आवश्यक आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईterroristदहशतवादीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र