शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कसाबला जिवंत पकडणे पोलिसांची सर्वोच्च कामगिरी : रमेश महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 20:11 IST

कसाब प्रकरणाने आपली न्यायव्यवस्था किती सक्षम आहे, हे जगाला दाखवून दिले.

औरंगाबाद : जगात जेवढे काही दहशतवादी हल्ले झालेत त्यात दहशतवादी जिवंत पकडला गेला नाही. मात्र, २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यात अवघ्या पावणेतीन तासांत दहशतवादी कसाबला जिवंत पकडण्यात मुंबईपोलिसांना यश आले. ही मुंबई पोलिसांची आजपर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे, असे या प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी व निवृत्त पोलीस निरीक्षक रमेश महाले यांनी येथे सांगितले. 

विवेक विचार मंचतर्फे संविधान दिनानिमित्त समाजजागृती मेळावा व ‘२६/११ दहशतवादी हल्ला : कसाब आणि तपास’ या व्याख्यानाचे आयोजन केले होते. भानुदासराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश प्रमोद आंबेकर होते. रमेश महाले यांनी ओघवत्या व सोप्या शैलीत २६/११ चा संपूर्ण घटनाक्रम व त्यानंतरचा तपास व कसाबला फाशीची शिक्षा होईपर्यंतची तपशीलवार माहिती दिली. भारतात आजपर्यंत जेवढे पाकिस्तान पुरस्कृत हल्ले झाले ते हल्ले त्यांच्या देशातील दहशवाद्यांनी केल्याचे पाकिस्तानने कधीच मान्य केले नाही; पण कसाबचे आम्ही एवढे पुरावे दिले की, अडीच महिन्यांनंतर पाकिस्तानने कसाब त्यांच्यात देशातील आहे, हे पहिल्यांदा मान्य केले. कसाब प्रकरणाने आपली न्यायव्यवस्था किती सक्षम आहे, हे जगाला दाखवून दिले. २,२०० साक्षीदार होते. त्यातील ६५८ साक्षीदारांची तपासणी झाली. एकही साक्षीदार फुटला नाही, हे उल्लेखनीय. यात कसाब एकटा नव्हता, तर लष्कर- ए-तोयबा, पाकिस्तान मिलिटरी व आयएसआय या तिघांच्या सहभागाने २६/११ चा हल्ला झाला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी कसाबला असे पकडून ठेवले की, त्यास जागचे हालू दिले नाही. यात ओंबळे शहीद झाले.  

मुंबई पोलीस तपास यंत्रणेतील ९८ लोकांनी एकही दिवस सुटी न घेता सलग ९० दिवसांत ११,३५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. दहशतवादी हल्ल्यात १५५ कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान झाले. दहशतवाद्यांकडील २३३ वस्तूंपैकी १५० वस्तू  ‘मेड इन पाकिस्तान’ होत्या. या तपासाशी निगडित अशा अनेक बाबींविषयी महाले यांनी माहिती दिली. दहशतवादी डेव्हिड हेडली याने मुंबईची रेकी करून पाकिस्तानाला माहिती दिली होती की, २६ नोव्हेंबर २००८ रोजी भारत- इंग्लंड क्रिकेट मॅच आहे. त्यादिवशी बोरीबंदरावर अत्यंत कमी लोक असतील. ती वेळ दहशतवाद्यांना बंदरावर उतरण्यास सुरक्षित राहील. यामुळे दहशतवाद्यांनी तो दिवस निवडल्याचे महाले म्हणाले.

घटनादुरुस्ती करताना सर्वांनी सजग राहावे - माजी जिल्हा न्यायाधीश प्रमोद आंबेकर यांनी सांगितले की, सत्ताधारी राजकीय पक्ष बहुसंख्येच्या बळावर राज्यघटना दुरुस्ती करत असतात.राजकीय फायद्यासाठी घटनादुरुस्ती करता येत नाही. हा राज्यघटनेवरील हल्लाच होय. राज्यघटना दुरुस्ती करताना मूळ गाभ्यात बदल करू नये, यासाठी सर्व जनतेने सजग राहणे आवश्यक आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईterroristदहशतवादीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र