शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CAA : दिल्ली हिंसाचाराचे मुंबईत उमटले पडसाद; पोलिसांनी रोखला कँडल मार्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 19:19 IST

CAA : आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते असून ३० ते ३५  पाहिजे आरोपींविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिसांनी भा. दं. वि कलम ३७ (१) (३) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देदिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारात १० जण मृत्युमुखी पडले तर जवळपास १५० जण जखमी झाले आहेत.पाहिजे आरोपितांनी  CAA आणि  NRC कायद्याच्या विरोधात भाषणे, निदर्शने करून शेम शेम अशा घोषणा देऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचवली म्हणून मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई - सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (CAA) ईशान्य दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते असून ३० ते ३५  पाहिजे आरोपींविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिसांनी भा. दं. वि कलम ३७ (१) (३) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.  सलग दुसऱ्या दिवशी उसळलेल्या हिंसाचाराच्या आगडोंबामुळे एका पोलिसासह इतर दहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Delhi Violence : दिल्लीत हिंसाचाराची धग कायम; 10 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी

दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारात १० जण मृत्युमुखी पडले तर जवळपास १५० जण जखमी झाले आहेत. या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनकर्त्यांना सोमवारी रात्री उशीरा कँडल मार्च काढण्यास पोलिसांनी अटकाव केला . त्यानंतर गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान,  आंदोलकांनी पोलिसांच्या अटकावामुळे मरिन ड्राईव्ह गाठत सुंदरमल जंक्शन येथे कँडलसह ठिय्या आंदोलन केले. एकूण ३० ते ३५ पाहिजे आरोपितांनी  CAA आणि  NRC कायद्याच्या विरोधात भाषणे, निदर्शने करून शेम शेम अशा घोषणा देऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचवली म्हणून मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान ही जागा निदर्शनांसाठी निश्चित करण्यात आलेली असताना देखील आंदोलकांनी निदर्शनासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात आले तिथे येण्यापासून त्यांना रोखलं असता ते मरिन ड्राइव्ह परिसरात जमा झाले. यामुळे स्थानिकांची गैरसोय होत होती. नेमून दिलेल्या जागेशिवाय शहरात इतरत्र  कुठेही बेकायदेशीरपणे गर्दी जमाँ केल्यास संबंधितांवर अटकेची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliceपोलिसdelhiदिल्लीMumbaiमुंबई