शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

Bus Accident: चालत्या बसला करंट लागला; तीन प्रवाशांचा मृत्यू, पाच जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 14:01 IST

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी गर्दी केली होती. हे प्रवासी संत सदारामच्या जत्रेमध्ये सहभागी होऊन घरी परतत होते. 

भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेल्या जैसलमेर जिल्ह्यात आज एक मोठी घटना घडली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमधून विजेचा प्रवाह पास झाला. यामध्ये ८ प्रवासी जखमी झाले. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य पाच जणांवर उपचार सुरु आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी गर्दी केली होती. हे प्रवासी संत सदारामच्या जत्रेमध्ये सहभागी होऊन घरी परतत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरपासून १५ किमी अंतरावर सकाळी १० वाजता पोलजी डेअरीजवळ हा अपघात झाला. परिसरातील खिनिया व खुईयाळा गावातील ग्रामस्थ भाड्याने खासगी बस घेऊन संत सदाराम यांच्या जत्रेला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली.

पोळजी डेअरीजवळ रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. यामुळे वरून जाणाऱ्या विजेच्या तारांची उंची कमी झाली होती. बसच्या छतावरही भाविक बसले होते. ते प्रवासी विद्युत तारांच्या संपर्कात आले आणि ही घटना घडली. संपूर्ण बसमध्ये करंट पसरला. मात्र, चालकाने तातडीने बस पुढे नेली. तोवर आठ जण गंभीररित्या विद्युत तारांमुळे भाजले होते. सर्व मृत आणि जखमी मेघवाल समाजाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसमध्ये बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघात