शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

संतापजनक! हुंड्यात 2 लाख कमी दिल्याने नवरदेवाने ऐनवेळी मोडलं लग्न; मेसेजवर सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 13:09 IST

Crime News : लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. तेवढ्यात अचानक वराच्या बाजूने आलेल्या एका मेसेजने सर्वांना मोठा धक्काच बसला.

नवी दिल्ली - बिहारच्या पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नववधू नटून-थटून नवरदेवाची वाट पाहत होती. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. पाहुणे मंडळी आली होती. गाणी लावून लहान मुलं नाचत होती. उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. लग्नाचा मंडप सजला होता. लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. तेवढ्यात अचानक वराच्या बाजूने आलेल्या एका मेसेजने सर्वांना मोठा धक्काच बसला. एका मेसेजने आनंदावर विरजण पडलं. हुंड्यात 2 लाख रुपये कमी आहेत. त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही असा मेसेज हा नवरदेवाकडून करण्यात आला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणामध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. या धक्कादायक घटनेत वराच्या बाजूच्या लोकांनी दोन लाख रुपये हुंडा कमी दिल्याचं कारण देत लग्न मोडल्याची चर्चा आहे. लग्न मोडल्यानंतर सोमवारी मुलीच्या वतीने महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन न्याय मागितला आहे. हुंडाबळी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कायदेशीर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मुलीने तक्रारीत म्हटलं आहे. पोलीस वराच्या पक्षाला पोलीस ठाण्यात बोलावतील, जेणेकरून दुसरी बाजू जाणून घेऊन प्रकरणाचा तपास करता येईल.

"दोन लाख रुपये हुंडा मिळत नाही तोपर्यंत वरात काढणार नाही"

मुलीने आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दिवशीच वराच्या घरच्यांनी निरोप पाठवून दोन लाख रुपये हुंडा मिळत नाही तोपर्यंत वरात काढणार नसल्याचं सांगितलं. वधू पक्षाच्या लोकांनी सांगितलं की, वराला हुंड्यात 3.50 लाख रोकड, एक अंगठी आणि 10 हजार रुपयांचे कपडे यासह लग्नातल्या खर्चासाठी 1.65 लाख रुपये दिले होते. लग्नाची सर्व तयारी तिच्या कुटुंबीयांनी पूर्ण केली होती. मात्र तरी देखील 13 डिसेंबरला लग्नाच्या दिवशी वर मंडळी वरात घेऊन आले नाहीत असं मुलीने म्हटलं आहे. 

मुलाच्या बाजुने बाहेरील लोकांमार्फत मेसेज केला. यामध्ये दोन लाखांपेक्षा कमी हुंड्यामुळे लग्न न झाल्याची चर्चा होती. लग्नाआधी बुकिंग आणि सर्व प्रकारचा कार्यक्रम मुलाच्या संमतीने केल्याचंही नवरीने सांगितलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार समाजसुधारणा अभियानांतर्गत अंमली पदार्थ निर्मूलन, बालविवाह बंदी आणि हुंडा निर्मूलन या तीन प्रमुख मुद्द्यांचा संदेश जनतेमध्ये असताना बिहारमध्ये ही परिस्थिती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्नdowryहुंडा