शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! हुंड्यात 2 लाख कमी दिल्याने नवरदेवाने ऐनवेळी मोडलं लग्न; मेसेजवर सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 13:09 IST

Crime News : लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. तेवढ्यात अचानक वराच्या बाजूने आलेल्या एका मेसेजने सर्वांना मोठा धक्काच बसला.

नवी दिल्ली - बिहारच्या पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नववधू नटून-थटून नवरदेवाची वाट पाहत होती. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. पाहुणे मंडळी आली होती. गाणी लावून लहान मुलं नाचत होती. उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. लग्नाचा मंडप सजला होता. लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. तेवढ्यात अचानक वराच्या बाजूने आलेल्या एका मेसेजने सर्वांना मोठा धक्काच बसला. एका मेसेजने आनंदावर विरजण पडलं. हुंड्यात 2 लाख रुपये कमी आहेत. त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही असा मेसेज हा नवरदेवाकडून करण्यात आला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणामध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. या धक्कादायक घटनेत वराच्या बाजूच्या लोकांनी दोन लाख रुपये हुंडा कमी दिल्याचं कारण देत लग्न मोडल्याची चर्चा आहे. लग्न मोडल्यानंतर सोमवारी मुलीच्या वतीने महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन न्याय मागितला आहे. हुंडाबळी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कायदेशीर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मुलीने तक्रारीत म्हटलं आहे. पोलीस वराच्या पक्षाला पोलीस ठाण्यात बोलावतील, जेणेकरून दुसरी बाजू जाणून घेऊन प्रकरणाचा तपास करता येईल.

"दोन लाख रुपये हुंडा मिळत नाही तोपर्यंत वरात काढणार नाही"

मुलीने आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दिवशीच वराच्या घरच्यांनी निरोप पाठवून दोन लाख रुपये हुंडा मिळत नाही तोपर्यंत वरात काढणार नसल्याचं सांगितलं. वधू पक्षाच्या लोकांनी सांगितलं की, वराला हुंड्यात 3.50 लाख रोकड, एक अंगठी आणि 10 हजार रुपयांचे कपडे यासह लग्नातल्या खर्चासाठी 1.65 लाख रुपये दिले होते. लग्नाची सर्व तयारी तिच्या कुटुंबीयांनी पूर्ण केली होती. मात्र तरी देखील 13 डिसेंबरला लग्नाच्या दिवशी वर मंडळी वरात घेऊन आले नाहीत असं मुलीने म्हटलं आहे. 

मुलाच्या बाजुने बाहेरील लोकांमार्फत मेसेज केला. यामध्ये दोन लाखांपेक्षा कमी हुंड्यामुळे लग्न न झाल्याची चर्चा होती. लग्नाआधी बुकिंग आणि सर्व प्रकारचा कार्यक्रम मुलाच्या संमतीने केल्याचंही नवरीने सांगितलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार समाजसुधारणा अभियानांतर्गत अंमली पदार्थ निर्मूलन, बालविवाह बंदी आणि हुंडा निर्मूलन या तीन प्रमुख मुद्द्यांचा संदेश जनतेमध्ये असताना बिहारमध्ये ही परिस्थिती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्नdowryहुंडा