शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

संतापजनक! हुंड्यात 2 लाख कमी दिल्याने नवरदेवाने ऐनवेळी मोडलं लग्न; मेसेजवर सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 13:09 IST

Crime News : लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. तेवढ्यात अचानक वराच्या बाजूने आलेल्या एका मेसेजने सर्वांना मोठा धक्काच बसला.

नवी दिल्ली - बिहारच्या पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नववधू नटून-थटून नवरदेवाची वाट पाहत होती. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. पाहुणे मंडळी आली होती. गाणी लावून लहान मुलं नाचत होती. उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. लग्नाचा मंडप सजला होता. लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. तेवढ्यात अचानक वराच्या बाजूने आलेल्या एका मेसेजने सर्वांना मोठा धक्काच बसला. एका मेसेजने आनंदावर विरजण पडलं. हुंड्यात 2 लाख रुपये कमी आहेत. त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही असा मेसेज हा नवरदेवाकडून करण्यात आला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणामध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. या धक्कादायक घटनेत वराच्या बाजूच्या लोकांनी दोन लाख रुपये हुंडा कमी दिल्याचं कारण देत लग्न मोडल्याची चर्चा आहे. लग्न मोडल्यानंतर सोमवारी मुलीच्या वतीने महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन न्याय मागितला आहे. हुंडाबळी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कायदेशीर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मुलीने तक्रारीत म्हटलं आहे. पोलीस वराच्या पक्षाला पोलीस ठाण्यात बोलावतील, जेणेकरून दुसरी बाजू जाणून घेऊन प्रकरणाचा तपास करता येईल.

"दोन लाख रुपये हुंडा मिळत नाही तोपर्यंत वरात काढणार नाही"

मुलीने आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दिवशीच वराच्या घरच्यांनी निरोप पाठवून दोन लाख रुपये हुंडा मिळत नाही तोपर्यंत वरात काढणार नसल्याचं सांगितलं. वधू पक्षाच्या लोकांनी सांगितलं की, वराला हुंड्यात 3.50 लाख रोकड, एक अंगठी आणि 10 हजार रुपयांचे कपडे यासह लग्नातल्या खर्चासाठी 1.65 लाख रुपये दिले होते. लग्नाची सर्व तयारी तिच्या कुटुंबीयांनी पूर्ण केली होती. मात्र तरी देखील 13 डिसेंबरला लग्नाच्या दिवशी वर मंडळी वरात घेऊन आले नाहीत असं मुलीने म्हटलं आहे. 

मुलाच्या बाजुने बाहेरील लोकांमार्फत मेसेज केला. यामध्ये दोन लाखांपेक्षा कमी हुंड्यामुळे लग्न न झाल्याची चर्चा होती. लग्नाआधी बुकिंग आणि सर्व प्रकारचा कार्यक्रम मुलाच्या संमतीने केल्याचंही नवरीने सांगितलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार समाजसुधारणा अभियानांतर्गत अंमली पदार्थ निर्मूलन, बालविवाह बंदी आणि हुंडा निर्मूलन या तीन प्रमुख मुद्द्यांचा संदेश जनतेमध्ये असताना बिहारमध्ये ही परिस्थिती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्नdowryहुंडा