शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

खळबळजनक! मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 9:03 AM

लग्नानंतर मुलाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगा आणि मुलीला संरक्षण देण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी तिथूनच मुलीच्या घरच्यांना फोन करुन माहिती दिली असा आरोप मुलाच्या घरच्यांनी लावला आहे.

नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. याठिकाणी एका मुलाने मुलीला घरातून पळवून नेत लग्न केल्याने त्याच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांना पोलीस स्टेशनसमोरुनच मुलीच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. त्यानंतर संतापलेले नातेवाईकांनी मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली.

लग्नानंतर मुलाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगा आणि मुलीला संरक्षण देण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी तिथूनच मुलीच्या घरच्यांना फोन करुन माहिती दिली त्यानंतर मुलीच्या घरचे पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले. मुलगा आणि मुलगी जसे पोलीस ठाण्याबाहेर निघाले तेव्हा त्या दोघांना बळजबरीनं उचलून घेऊन गेले. गंभीररित्या जखमी मुलावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो मृत्यूशी संघर्ष करत आहे. मुलाच्या घरच्यांनी सांगितले की, २३ वर्षीय युवक कुटुंबासह राजौरी गार्डन टीसी कॅम्प परिसरात राहत होता. सूरज आणि रोशनी (बदललेलं नाव) एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांनी १५-२० दिवसांपूर्वी घरातून पळून जात लग्न केले. त्यानंतर जीवाला धोका आहे असं सांगत बुधवारी संध्याकाळी ५ वाजता राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात पोहचले. दोघांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले.

मुलाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी फोन करुन माहिती दिली तेव्हा तिचे नातेवाईक पोलीस ठाण्याबाहेर पोहचले. पोलिसांकडून सुरक्षा मिळालीच नाही मात्र पोलीस ठाण्याबाहेरुनच दोघांचं अपहरण करुन सागरपूरला घेऊन गेले. त्याठिकाणी सूरजला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. रक्ताच्या थारोळ्यात सूरजला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सूरजची अवस्था गंभीर असून तो जगण्यासाठी संघर्ष करत आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत गौतम म्हणाले की, पोलिसांनी सफदरजंग हॉस्पिटलमधून सूचना मिळाली होती. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. पीडित मुलगा राजौरी गार्डन टीसी कॅम्प येथे राहण्यास होता तर मुलगी सागरपूर परिसरात राहायला होती. दोघंही बुधवारी दिल्लीत आले होते. तर मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. मुलीच्या घरच्यांनी दुसरीकडून मुलीने पळून जात लग्न केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांना जबरदस्तीनं उचलून नेत सागरपूर परिसरात घेऊन गेले. या प्रकरणात हत्येचा प्रयत्न आणि अपहरण याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या घरच्यांचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :delhiदिल्ली