शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; २ मुलांसह डॉक्टर दाम्पत्यानं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:46 IST

आज सकाळी त्यांचा वाहन चालक घरी पोहचला त्याने दरवाजा ठोठावला परंतु काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले

चेन्नईच्या अन्नानगर परिसरात आज सकाळी एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनं परिसरात खळबळ माजली आहे. मृतांमध्ये डॉक्टर, त्यांची पत्नी आणि २ मुलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी हे सर्व मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवून तपासाला सुरूवात केली. डॉक्टर दाम्पत्य खूप आनंदी होते, ऐशो-आरामात जीवन जगत होते असं डॉक्टरच्या वाहन चालकाने सांगितले. प्राथमिक तपासात २ कारणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलीस माहितीनुसार, घरातील चौघाच्या मृत्यूचं कारण कर्जाचा बोझा आणि मुलावर नीट परीक्षेचा दबाव हे असण्याची शक्यता आहे. डॉक्टर बालामुरुगन हे सोनोलॉजिस्ट होते. त्यांची पत्नी सुमथी वकील होती तर २ मुले जसवंत कुमार आणि लिंगेश कुमार यांचा मृतदेह दोन वेगवेगळ्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. जसवंत कुमार हा नीटची परीक्षा देत होता. डॉक्टर बालामुरुगन अनेक अल्ट्रासाऊंड सेंटर चालवायचे. आज सकाळी त्यांचा वाहन चालक घरी पोहचला त्याने दरवाजा ठोठावला परंतु काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. त्यांनी घरचा दरवाजा उघडताच या चौघांच्या मृत्यूचं समोर आले.

ही आत्महत्या असावी असं प्रथमदर्शनी वाटत आहे. परंतु अद्याप कुणीही तक्रार दाखल केली नाही. कुटुंबाने मृत्यूपूर्वी सुसाईड नोटही लिहिली नाही, कुटुंबावर कर्जाचा बोझा होता का हेदेखील स्पष्ट नाही. पोलीस सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहेत असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी