शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

अकाेल्यातील गाेळीबाराच्या घटनांचा रक्तरंजित इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 10:46 AM

Bloody history of Firing : जिल्ह्यात गत काही वर्षांत गाेळ्या झाडून नऊ हत्याकांड आणि जखमी करण्याच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत.

ठळक मुद्देप्रहारचे नेते तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली हाेती.किशाेर खत्री यांच्यावरही गाेळ्या झाडून त्यांची साेमठाणा शेतशिवारात हत्या करण्यात आली हाेती. शर्मा नामक व्यक्तीवर गाेळ्या झाडून त्यांची हत्या केली हाेती.

- सचिन राऊत

अकाेला : राज्यातील गुन्हेगारी जगतामध्ये अकाेल्यातील गुन्हेगारीची आकडेवारी टाॅप टेनमध्येच असल्याचे आता गाेपाल अग्रवाल यांच्यावरील गाेळीबाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गाेळीबारीच्या घटनांचा रक्तरंजीत इतिहास असून, एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हे दुसरे गाेळ्या झाडून हत्याकांड घडले असून, जिल्ह्यात गत काही वर्षांत गाेळ्या झाडून नऊ हत्याकांड आणि जखमी करण्याच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत.

एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रुंग्टा टायर रिमाेल्डिंग या कंपनीसमाेर चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील तीन जणांनी शर्मा नामक व्यक्तीवर गाेळ्या झाडून त्यांची हत्या केली हाेती. शहरातील प्रसिद्ध उद्याेजक तथा व्यवसायी किशाेर खत्री यांच्यावरही गाेळ्या झाडून त्यांची साेमठाणा शेतशिवारात हत्या करण्यात आली हाेती. या वर्षात सुरुवातीलाच प्रहारचे नेते तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली हाेती. त्यानंतर वडिलांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या बेतात असतानाच बाबा भारती यांनी त्यांचा गुंडप्रवृत्तीचा मुलगा मनीष यांच्यावर गाेळी झाडली हाेती, तर पिंजर पाेलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर पाेलीस अधिकाऱ्यानेच गाेळीबार केल्याचे एक माेठे कांड जिल्ह्यात घडले आहे. आकाेट फैलातील टाेळीयुद्धात कुरेशी नामक व्यक्तीची टाेळीयुद्धातून गाेळ्या झाडून हत्या करण्यात आली हाेती. दरम्यान, शहरालगत असलेल्या मलकापूरचे सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांच्यावरही गाेळीबार करून त्यांचे हत्याकांड घडविण्यात आले हाेते. यासाेबतच पाेलीस अधिकारी असलेले आयपीएस व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यावर गाेळी झाडण्यात आली हाेती, तर माजी नगरसेवक रामटेके यांच्यावर दाेन वेळा गाेळीबार झाल्याची नाेंद पाेलिसांत आहे. यावरून अकाेला जिल्ह्यात गाेळीबार करून जखमी करणे तसेच खुनाच्या उद्देशाने गाेळ्या झाडून हत्या झाल्याचा घटनांचा रक्तरंजित इतिहास असल्याचे गाेपाल अग्रवाल यांच्यावर झालेल्या गाेळीबारीच्या घटनेने समाेर आले आहे. मुकीम अहमद आणि आसीफ खान या दाेघांचेही हत्याकांड जिल्ह्यातील माेठ्या घटनांमध्ये असल्याचे स्पष्ट आहे.

वर्षाचा प्रारंभ अन् शेवट गाेळीबाराने

२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी काेराेनाचे माेठे संकट घेऊन आले. मात्र अकाेला जिल्ह्यात २०२० या वर्षांचा प्रारंभ प्रहारचे नेते तुषार पुंडकर यांच्यावरील गाेळीबाराने सुरू झाले, तर शेवटही गाेपाल अग्रवाल यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या करूनच झाला. यावरून पाेलिसांना गाेळीबाराच्या घटनेचीच सलामी वर्षाच्या प्रारंभी आणि शेवटी मिळाली.

घटनांचा तपास तातडीने

गाेळ्या झाडून हत्या करणे तसेच गंभीर जखमी करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र या मोठ्या घटनांचा तपासही पाेलिसांनी तेवढ्याच तातडीने केल्याचे वास्तव आहे. बहुतांश हत्याकांडाचा तपास करण्यात पाेलिसांना यश आले आहे, तर काही प्रकरणात आराेपींना शिक्षाही झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून