शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अकाेल्यातील गाेळीबाराच्या घटनांचा रक्तरंजित इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 10:51 IST

Bloody history of Firing : जिल्ह्यात गत काही वर्षांत गाेळ्या झाडून नऊ हत्याकांड आणि जखमी करण्याच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत.

ठळक मुद्देप्रहारचे नेते तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली हाेती.किशाेर खत्री यांच्यावरही गाेळ्या झाडून त्यांची साेमठाणा शेतशिवारात हत्या करण्यात आली हाेती. शर्मा नामक व्यक्तीवर गाेळ्या झाडून त्यांची हत्या केली हाेती.

- सचिन राऊत

अकाेला : राज्यातील गुन्हेगारी जगतामध्ये अकाेल्यातील गुन्हेगारीची आकडेवारी टाॅप टेनमध्येच असल्याचे आता गाेपाल अग्रवाल यांच्यावरील गाेळीबाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गाेळीबारीच्या घटनांचा रक्तरंजीत इतिहास असून, एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हे दुसरे गाेळ्या झाडून हत्याकांड घडले असून, जिल्ह्यात गत काही वर्षांत गाेळ्या झाडून नऊ हत्याकांड आणि जखमी करण्याच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत.

एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रुंग्टा टायर रिमाेल्डिंग या कंपनीसमाेर चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील तीन जणांनी शर्मा नामक व्यक्तीवर गाेळ्या झाडून त्यांची हत्या केली हाेती. शहरातील प्रसिद्ध उद्याेजक तथा व्यवसायी किशाेर खत्री यांच्यावरही गाेळ्या झाडून त्यांची साेमठाणा शेतशिवारात हत्या करण्यात आली हाेती. या वर्षात सुरुवातीलाच प्रहारचे नेते तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली हाेती. त्यानंतर वडिलांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या बेतात असतानाच बाबा भारती यांनी त्यांचा गुंडप्रवृत्तीचा मुलगा मनीष यांच्यावर गाेळी झाडली हाेती, तर पिंजर पाेलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर पाेलीस अधिकाऱ्यानेच गाेळीबार केल्याचे एक माेठे कांड जिल्ह्यात घडले आहे. आकाेट फैलातील टाेळीयुद्धात कुरेशी नामक व्यक्तीची टाेळीयुद्धातून गाेळ्या झाडून हत्या करण्यात आली हाेती. दरम्यान, शहरालगत असलेल्या मलकापूरचे सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांच्यावरही गाेळीबार करून त्यांचे हत्याकांड घडविण्यात आले हाेते. यासाेबतच पाेलीस अधिकारी असलेले आयपीएस व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यावर गाेळी झाडण्यात आली हाेती, तर माजी नगरसेवक रामटेके यांच्यावर दाेन वेळा गाेळीबार झाल्याची नाेंद पाेलिसांत आहे. यावरून अकाेला जिल्ह्यात गाेळीबार करून जखमी करणे तसेच खुनाच्या उद्देशाने गाेळ्या झाडून हत्या झाल्याचा घटनांचा रक्तरंजित इतिहास असल्याचे गाेपाल अग्रवाल यांच्यावर झालेल्या गाेळीबारीच्या घटनेने समाेर आले आहे. मुकीम अहमद आणि आसीफ खान या दाेघांचेही हत्याकांड जिल्ह्यातील माेठ्या घटनांमध्ये असल्याचे स्पष्ट आहे.

वर्षाचा प्रारंभ अन् शेवट गाेळीबाराने

२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी काेराेनाचे माेठे संकट घेऊन आले. मात्र अकाेला जिल्ह्यात २०२० या वर्षांचा प्रारंभ प्रहारचे नेते तुषार पुंडकर यांच्यावरील गाेळीबाराने सुरू झाले, तर शेवटही गाेपाल अग्रवाल यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या करूनच झाला. यावरून पाेलिसांना गाेळीबाराच्या घटनेचीच सलामी वर्षाच्या प्रारंभी आणि शेवटी मिळाली.

घटनांचा तपास तातडीने

गाेळ्या झाडून हत्या करणे तसेच गंभीर जखमी करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र या मोठ्या घटनांचा तपासही पाेलिसांनी तेवढ्याच तातडीने केल्याचे वास्तव आहे. बहुतांश हत्याकांडाचा तपास करण्यात पाेलिसांना यश आले आहे, तर काही प्रकरणात आराेपींना शिक्षाही झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून