शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

छापेमारीसाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीचा तलवारीने हल्ला; अधिकाऱ्याचं डोकं फुटलं, अनेक पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 14:41 IST

Crime News : पोलिसांच्या टीमला पाहताच आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आहेत. 

नवी दिल्ली - देशात अनेक भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. बिहारमधील वैशाली जिल्ह्यामध्ये आरोपींची दहशत पाहायला मिळत आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री पोलिसांची एक टीम आरोपीला अटक करण्यासाठी गावामध्ये आली होती. पोलिसांच्या टीमला पाहताच आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आहेत. 

आरोपींनी पोलिसांच्या टीमवर गोळीबार देखील केला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक लोकांना ताब्यात घेतलं आहे. जखमी पोलिसांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महुआ एसडीपीओ पूनम केसरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पोलिसांची एक टीम छापेमारीसाठी गेली होती. अंधाराचा फायदा घेत आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांनी दगडफेक सुरू केली. यानंतर तलवारीने देखील हल्ला केला. 

पोलिसांवर आरोपींनी गोळीबार देखील केला. परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने एक्स्ट्रा फोर्स बोलवण्यात आलं. ज्यानंतर जवळपास 12 ते 13 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हल्ल्यामध्ये अनेक अधिकारी जखमी झाले असून सरकारी संपत्तीचं मोठं नुकसान झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक हैराण करणारी घटना घडली आहे. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून एक महिला कॉन्स्टेबल बेपत्ता झाली होती. मात्र आता अचानक ती फुलांची विक्री करताना सापडली आहे. 

बापरे! अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून बेपत्ता झाली होती महिला कॉन्स्टेबल अन् आता....

रायपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल अंजना सहिस गेल्या नऊ महिन्यांपासून बेपत्ता होत्या. आपले कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून त्या अचानक गायब झाल्या होत्या. मात्र आता उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये फुलांची विक्री करताना दिसून आल्या आहेत. महिला कॉन्स्टेबल अंजना सहिस वृंदावनमध्ये फुल विकत असल्याची माहिती मिळताच छत्तीसगड पोलिसांची एक टीम त्यांना घेण्यासाठी आली. मात्र अंजना यांनी त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गेले अनेक महिने पोलीस अंजना यांचा शोध घेत होते. मात्र त्या सापडतच नव्हत्या. त्यांच्या आईने आपली मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर शोध सुरू होता. पण अंजना यांनी मोबाईलचा वापर करणं बंद केल्याने त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस