शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

मस्करीची कुस्करी! मेहुण्याच्या लग्नाला गेलेल्या भावोजींना उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 23:22 IST

तरुणाला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू; आरोपी फरार

बांका: बिहारच्या बांका जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला काही तरुणांनी उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. मस्करी सुरू असताना वाद झाला आणि त्यातून हा प्रकार घडला. उकळत्या तेलाच्या कढईत टाकण्यात आल्यानं व्यक्ती अतिशय गंभीररित्या भाजला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

बांका जिल्ह्यातल्या पहाडपूर येथे राहणारे पप्पू यादव २७ एप्रिलला महादेवावरण येथे गेले. तिथे त्यांच्या मेहुण्याचा विवाह होता. लग्नात विकास यादव आणि शिवा यादव यांनी पप्पू यादव यांची थट्टा केली. त्यावरून वाद झाला. यानंतर विकास आणि शिवा यांनी पप्पू यांना उचलून उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं.

वरातीच्या दिवशी पप्पू यादव घरासमोर असलेल्या बाजेवर झोपले होते. त्यावेळी दोनियार गावचे रहिवासी असलेल्या विकास यादव आणि अन्य तरुणांनी पप्पू यादव यांना गरम तेलाच्या कढईत टाकलं. पप्पू यादव यांच्या पाठीला इजा झाली. जखमी पप्पू यादव यांच्यावर कटोरियातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.