शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 23:18 IST

बिहारमध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारण्यात आलं.

Bihar Crime: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात पाच जणांना जाळून मारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांना मारहाण करून, नंतर जिवंत जाळण्यात आलं. तेटगामा गावात हा सगळा प्रकार घडला. गावातील रहिवासी रामदेव ओरांव यांच्या मुलाचा तीन दिवसांपूर्वी भूतबाधा आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या मुलाची प्रकृतीही खालावली होती. त्यांच्या मृत्यूचे कारण चेटकीण असल्याचा संशय गावकऱ्यांना होता. याच संशयातून गावकऱ्यांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना संपवलं.

गावकऱ्यांनी चेटकीण असल्याच्या आरोपाखाली एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये बाबूलाल ओरांव, सीता देवी, मनजीत ओरांव, राणी देवी आणि काकतो यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील लोकांनी घरं सोडली आहेत. ही घटना रविवारी रात्री घडली आणि ज्या भागात ही घटना घडली तो पूर्णपणे आदिवासी भाग आहे.

"हे प्रकरण भूतबाधा आणि काळ्या जादूशी संबंधित असून या वादातून ही घटना घडली. पोलिसांनी जवळच्या तलावातून चार मृतदेह बाहेर काढले आहेत. सर्व मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहेत. त्यांना मारहाण करून जाळण्यात आले की जाळून मारण्यात आले हे सांगणे कठीण आहे, असं पोलिसांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबाला मारहाण करून जिवंत जाळण्यात आले, आम्ही कसेबसे जीव वाचवत तिथून पळून गेलो, त्यांना जाळल्यानंतर पाण्यात फेकण्यात आले, असं मृताच्या कुटुंबातील ललितने सांगितले.

या घटनेत जर कोणी वाचले तर ते कुटुंबातील सोनू कुमार नावाचा मुलगा होता. तो भीतीने पळून गेला. त्याने पहाटे ५ वाजता पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. मुलाने दिलेल्या माहितीनुसार कुटुंबियांच्या हत्येमध्ये संपूर्ण गावाचा सहभाग होता. मुलाने चार मुख्य आरोपींची नावे सांगितली असून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. दोघांच्या चौकशीदरम्यान, पोलीस मृतदेह लपवलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर, गावकऱ्यांच्या मदतीने पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

लोक म्हणतात की गावातील काही लोकांना बाबूलाल ओरांव यांची पत्नी सीता देवी ही चेटकीण असल्याचा संशय होता. या संशयावरून गेल्या काही वर्षांपासून लोक सीता देवींना चेटकीण म्हणत त्रास देत होते. गेल्या काही महिन्यांत या गावात चार-पाच मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकांना असा संशय आला की सीता देवी यांनी सर्वांना मारले. रविवारी संध्याकाळीही सीता देवी आणि गावातील काही लोकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर या वादात संपूर्ण कुटुंबाला संपवण्यात आलं.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस