शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 23:18 IST

बिहारमध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारण्यात आलं.

Bihar Crime: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात पाच जणांना जाळून मारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांना मारहाण करून, नंतर जिवंत जाळण्यात आलं. तेटगामा गावात हा सगळा प्रकार घडला. गावातील रहिवासी रामदेव ओरांव यांच्या मुलाचा तीन दिवसांपूर्वी भूतबाधा आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या मुलाची प्रकृतीही खालावली होती. त्यांच्या मृत्यूचे कारण चेटकीण असल्याचा संशय गावकऱ्यांना होता. याच संशयातून गावकऱ्यांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना संपवलं.

गावकऱ्यांनी चेटकीण असल्याच्या आरोपाखाली एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये बाबूलाल ओरांव, सीता देवी, मनजीत ओरांव, राणी देवी आणि काकतो यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील लोकांनी घरं सोडली आहेत. ही घटना रविवारी रात्री घडली आणि ज्या भागात ही घटना घडली तो पूर्णपणे आदिवासी भाग आहे.

"हे प्रकरण भूतबाधा आणि काळ्या जादूशी संबंधित असून या वादातून ही घटना घडली. पोलिसांनी जवळच्या तलावातून चार मृतदेह बाहेर काढले आहेत. सर्व मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहेत. त्यांना मारहाण करून जाळण्यात आले की जाळून मारण्यात आले हे सांगणे कठीण आहे, असं पोलिसांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबाला मारहाण करून जिवंत जाळण्यात आले, आम्ही कसेबसे जीव वाचवत तिथून पळून गेलो, त्यांना जाळल्यानंतर पाण्यात फेकण्यात आले, असं मृताच्या कुटुंबातील ललितने सांगितले.

या घटनेत जर कोणी वाचले तर ते कुटुंबातील सोनू कुमार नावाचा मुलगा होता. तो भीतीने पळून गेला. त्याने पहाटे ५ वाजता पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. मुलाने दिलेल्या माहितीनुसार कुटुंबियांच्या हत्येमध्ये संपूर्ण गावाचा सहभाग होता. मुलाने चार मुख्य आरोपींची नावे सांगितली असून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. दोघांच्या चौकशीदरम्यान, पोलीस मृतदेह लपवलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर, गावकऱ्यांच्या मदतीने पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

लोक म्हणतात की गावातील काही लोकांना बाबूलाल ओरांव यांची पत्नी सीता देवी ही चेटकीण असल्याचा संशय होता. या संशयावरून गेल्या काही वर्षांपासून लोक सीता देवींना चेटकीण म्हणत त्रास देत होते. गेल्या काही महिन्यांत या गावात चार-पाच मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकांना असा संशय आला की सीता देवी यांनी सर्वांना मारले. रविवारी संध्याकाळीही सीता देवी आणि गावातील काही लोकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर या वादात संपूर्ण कुटुंबाला संपवण्यात आलं.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस