शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बिहारमध्ये भीषण अपघात, ट्रकने अनेकांना चिरडले; 15 ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 23:31 IST

अपघातानंतर ट्रक समोरील पिंपळाच्या झाडावर जाऊन आदळला आहे. चालक ट्रकमध्येच अडकला असल्याचे सांगितले जात आहे.

हाजीपूर : बिहारच्या वैशालीमध्ये भीषण अपघात घडला आहे. एक अनियंत्रित ट्रकने अनेक लोकांना चिरडले आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून अधिकृत आकडा आलेला नाही. अपघातानंतर घटनास्थळी धावपळ उडाली होती. 

महनार-हाजीपूर मुख्य मार्गावर हा अपघात झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरु करण्य़ात आले आहे. महनार मोहद्दीनगर एसएचवरील ब्रह्मस्थानाजवळ लोक भुइयां बाबाची पूजा करत होते. यावेळी रस्त्यावर उभ्य़ा असलेल्या लोकांना ट्रकने चिरडले. यामध्ये १० ते १५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 

अपघातानंतर ट्रक समोरील पिंपळाच्या झाडावर जाऊन आदळला आहे. चालक ट्रकमध्येच अडकला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ट्रकच्या केबिनमध्ये देखील काहीजण अडकले आहेत. अपघातानंतर अटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. ट्रक चालक नशेत होता, असे स्थानिकांनी सांगितले. 

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहार