शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Crime News: उत्तरप्रदेशमधल्या भांडणाचा राग; महिलेच्या जाळ्यात अडकविले, पोलिसांनी तिघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 20:19 IST

 सज्जन अली याचे उत्तरप्रदेश येथील गावी एका व्यक्ती सोबत भांडण झाले असता त्याचा राग मनात असल्याने त्यास धडा शिकविण्यासाठी आरोपी लाल मोहम्मद फकीर,शकील मोहम्मद फकीर, व नेहालाल मोहम्मद फकीर ( सर्व रा.धामणकर नाका भिवंडी ) यांनी त्याच्या अपहरणाचा कट रचला होता .

नितिन पंडीत 

भिवंडी: उत्तर प्रदेश येथील गावात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघा जणांनी आपसात संगनमत करुन मुंबई गोरेगाव येथे राहणाऱ्या सज्जन अली शब्बीर अली फकीर ( वय २० वृक्ष ) यास एका महिलेसोबत मैत्रीत अडकविले. त्यानंतर मोबाईलवरून अश्लिल संभाषणाच्या जाळ्यात ओढत फसवून भिवंडी येथे बोलावून त्यास मित्रासह डांबून ठेवत पैशांची मागणी केल्या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी तक्रार दाखल होताच तातडीने पावले उचलत तिघा जणांना रविवारी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे . 

 सज्जन अली याचे उत्तरप्रदेश येथील गावी एका व्यक्ती सोबत भांडण झाले असता त्याचा राग मनात असल्याने त्यास धडा शिकविण्यासाठी आरोपी लाल मोहम्मद फकीर,शकील मोहम्मद फकीर, व नेहालाल मोहम्मद फकीर ( सर्व रा.धामणकर नाका भिवंडी ) यांनी त्याच्या अपहरणाचा कट रचला होता . सज्जांचे अपहरण करून अद्दल शिकवून नातेवाईकांकडून पैसे उकलण्याचा डाव या तिघांनी आखला होता . त्यासाठी एक नवा सिमकार्ड घेऊन त्याद्वारे इंदु नावाची आभासी व्यक्ती बनुन १३ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान फिर्यादी याच्याशी मोबाईल द्वारे संभाषण करून अश्लील मॅसेज पाठविले व ५ फेब्रुवारी रोजी भेटीचे आमिष दाखवून फोन करुन भिवंडी शहरातील नारपोली येथे बोलावुन घेतले . सज्जन हा रविवारी सकाळी आठ वाजता त्याच्या मित्रांसोबत भिवंडीत पोहचला असता त्याचे अपहरण करून रात्री साडे अकरा वाजता पर्यंत लाल मोहम्मद याने त्याचा भाऊ कलाम यांचे शांतीनगर, बाबाहॉटेल जवळ भिवंडी येथे सज्जन अली व त्यांचा मित्र मोहम्मद शमीम यास डांबुन ठेवले. त्यांच्या कडून २० हजार रुपये दे नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ करीत मारहाण करीत सज्जन अली शब्बीर अली फकीर याची आई, भाऊ, अरमान, असलम यांना तसेच त्याचे मालक बाबु शेठ यांना गुगल पे वरून पैशाची मागणी केली.

दरम्यान या बाबतची तक्रार शांतीनगर पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शांतीनगर बाबा हॉटेल परिसरातील एक खोलीतून दोघांची सुटका करीत तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख हे करीत आहेत. तिघा आरोपींना सोमवारी न्यायालयात हजार केले असता तिघांनाही १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी