शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

देशभरातील विमानतळांना बीसीएएसचा अतिदक्षतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 21:27 IST

सुरक्षिततेच्या कारणास्तव व्हिजिटर पास बंद, सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश

ठळक मुद्दे १५ ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई - विमानतळांवर दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेने नागरी हवाई वाहतूकीची सुरक्षा सांभाळणाऱ्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी (बीसीएएस) ने मुंबईसह देशभरातील विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. देशातील हवाई वाहतूक क्षेत्राला वाढलेल्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.१० ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत विमानतळावर आगंतुकांना प्रवेश दिला जावू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. १५ ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथक, जलद कृती दलांना सर्व विमानतळांवर कार्यरत करावे, निरीक्षण वाढवावे, विमानतळाकडे जाणाऱ्या नाक्यांवर वाहनांची व नागरिकांची तपासणी करावी, कार्गो टर्मिनलवरील सुरक्षेत वाढ करावी, सशस्त्र जवानांनी यावर लक्ष ठेवावे, टर्मिनल इमारत, ऑपरेशनल विभाग यामध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, प्रत्येक प्रवाशावर लक्ष ठेवावे, विमानतळाच्या इमारतीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक तैनात ठेवावे, टर्मिनल इमारतीजवळ कोणतेही वाहन पार्क करण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, पार्किंगमध्ये लक्ष ठेवावे, टर्मिनल इमारतीत येणाऱ्या प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवावे, विमानतळावर येणाऱ्या वाहनाची पूर्ण तपासणी करावी, चालकाचे ओळखपत्र तपासावे, हवाई रुग्णवाहिका (एअर अ‍ॅम्ब्युलन्ससहित) वेळापत्रकात नसलेल्या विमानांच्या उड्डाणांवर व आगमनावर लक्ष ठेवावे, विमानात कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची काळजी घ्यावी, बॅगेज क्षेत्रावर देखील लक्ष ठेवावे, अशा विविध सूचना बीसीएएसच्या उप संचालक सी.के. रंगा यांनी दिल्या आहेत. विमानतळावरील सुरक्षेसोबत कोणतीही त्रुटी होणार नाही याची काळजी घ्यावी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी, बीसीएएसचे विभागीय संचालक यांनी परिस्थितीचा व्यक्तिश: आढावा घ्यावा व सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करावी असे निर्देश बीसीएएसच्या संचालकांकडून देण्यात आले आहेत. विमानतळांसोबत एअरिस्ट्रप, फ्लाईंग स्कूल, हवाई वाहतूक प्रशिक्षण केंद्रांवरील सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :AirportविमानतळIndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिवस