शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 10:35 IST

बंगळुरू येथील शर्मा कुटुंबियांची पोलखोल, पाकिस्तानहून भारतात आलं, बनावट ओळखपत्र बनवली. पोलिसांनी केली अटक

बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथून ४ पाकिस्तानी नागरिकांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. या चार पैकी २ महिला आहेत. बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे दाखवून या चौघांनी भारतीय पासपोर्ट बनवला. चौघं गेल्या १० वर्षापासून धर्म प्रचाराचं काम करत होते. हे आरोपी स्वत:ला हिंदू म्हणवून घ्यायचे. २०१४ साली ते दिल्ली आले होते आणि २०१८ साली ते बंगळुरू येथे पोहचले. रविवारी बंगळुरुच्या बाहेरील भाग जिगानी येथील धाडीत या चौघांना पकडण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेले चौघे पाकिस्तानचे असून त्यात कराची येथील राशिद अली सिद्धीकी उर्फ शंकर शर्मा, लाहौर येथील आयशा उर्फ आशा रानी, हनीम मोहम्मद उर्फ रामबाबू शर्मा, रुबीना उर्फ रानी शर्मा अशी यांची नावे आहेत. बंगळुरु पोलिसांनी या चौघांना कोर्टात हजर केले. ज्याठिकाणी १० दिवसांच्या पोलीस कोठडीत आरोपींना पाठवले. या चौघांव्यतिरिक्त आणखी कुणी साथीदार अथवा रॅकेट आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.

गुप्तचर यंत्रणाही करणार तपास

पाकिस्तानी नागरिकांना पकडल्यानंतर गुप्तचर यंत्रणाही जिगानी इथं दाखल झाले. आरोपींबाबत तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. आरोपींवर पासपोर्ट अधिनियम १९६७ अंतर्गत कलम १२(१), १२(१एबी), १२(२) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ सप्टेंबरला बंगळुरूच्या जिगानी पोलिसांना राजापुरा गावात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चौघांना अटक केली.

सर्व आरोपींची हिंदू नावाने पासपोर्ट

याआधी चेन्नई पोलिसांनी यांच्या २ नातेवाईकांना अटक केली होती. आरोपी राशिद अली सिद्दीकी उर्फ शंकर शर्मा आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य घर खाली करत होते. पोलीस चौकशीत राशिदनं दावा केला की तो दिल्लीचा रहिवाशी आहे. मागील ६ वर्षापासून बंगळुरू इथे राहतो. चौकशीत पोलिसांना या चौघांकडून हिंदू नावांची पासपोर्टही आढळले. यांच्या घराची झडती घेतली तेव्हा भिंतीवर मेहंदी फाऊंडेशन इंटरनॅशनल जश्न ए यूनूस हे लिहिलेले निदर्शनास आले.

त्याशिवाय पोलिसांना त्यांच्या घरातून एका मुस्लीम धार्मिक नेत्याचा फोटो सापडला. चौकशीत हे लोक पाकिस्तानचे असून चेन्नईत अटक केलेले लोक त्यांचे नातेवाईक असल्याचं पुढे आले. आरोपी राशिद अली सिद्दिकी कराचीतील लियाकतबादचा रहिवासी आहे. तो त्याच्या पत्नीसह आई वडिलांसोबत मिळून हिंदू बनून भारतात राहत होता. २०११ साली आयशाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाखत झाली. लग्नावेळी तिचं कुटुंब बांगलादेशात राहायचे. पाकिस्तानी धार्मिक नेत्यांकडून छळ झाल्यानंतर तो पत्नीसह बांगलादेशात राहायला गेला होता. आरोपींना त्यांच्या खर्चासाठी मेहंदी फाऊंडेशनकडून पैसे मिळायचे. हे फाऊंडेशन भारतासह जगभरात सक्रीय आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतBangladeshबांगलादेश