शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 10:35 IST

बंगळुरू येथील शर्मा कुटुंबियांची पोलखोल, पाकिस्तानहून भारतात आलं, बनावट ओळखपत्र बनवली. पोलिसांनी केली अटक

बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथून ४ पाकिस्तानी नागरिकांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. या चार पैकी २ महिला आहेत. बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे दाखवून या चौघांनी भारतीय पासपोर्ट बनवला. चौघं गेल्या १० वर्षापासून धर्म प्रचाराचं काम करत होते. हे आरोपी स्वत:ला हिंदू म्हणवून घ्यायचे. २०१४ साली ते दिल्ली आले होते आणि २०१८ साली ते बंगळुरू येथे पोहचले. रविवारी बंगळुरुच्या बाहेरील भाग जिगानी येथील धाडीत या चौघांना पकडण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेले चौघे पाकिस्तानचे असून त्यात कराची येथील राशिद अली सिद्धीकी उर्फ शंकर शर्मा, लाहौर येथील आयशा उर्फ आशा रानी, हनीम मोहम्मद उर्फ रामबाबू शर्मा, रुबीना उर्फ रानी शर्मा अशी यांची नावे आहेत. बंगळुरु पोलिसांनी या चौघांना कोर्टात हजर केले. ज्याठिकाणी १० दिवसांच्या पोलीस कोठडीत आरोपींना पाठवले. या चौघांव्यतिरिक्त आणखी कुणी साथीदार अथवा रॅकेट आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.

गुप्तचर यंत्रणाही करणार तपास

पाकिस्तानी नागरिकांना पकडल्यानंतर गुप्तचर यंत्रणाही जिगानी इथं दाखल झाले. आरोपींबाबत तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. आरोपींवर पासपोर्ट अधिनियम १९६७ अंतर्गत कलम १२(१), १२(१एबी), १२(२) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ सप्टेंबरला बंगळुरूच्या जिगानी पोलिसांना राजापुरा गावात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चौघांना अटक केली.

सर्व आरोपींची हिंदू नावाने पासपोर्ट

याआधी चेन्नई पोलिसांनी यांच्या २ नातेवाईकांना अटक केली होती. आरोपी राशिद अली सिद्दीकी उर्फ शंकर शर्मा आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य घर खाली करत होते. पोलीस चौकशीत राशिदनं दावा केला की तो दिल्लीचा रहिवाशी आहे. मागील ६ वर्षापासून बंगळुरू इथे राहतो. चौकशीत पोलिसांना या चौघांकडून हिंदू नावांची पासपोर्टही आढळले. यांच्या घराची झडती घेतली तेव्हा भिंतीवर मेहंदी फाऊंडेशन इंटरनॅशनल जश्न ए यूनूस हे लिहिलेले निदर्शनास आले.

त्याशिवाय पोलिसांना त्यांच्या घरातून एका मुस्लीम धार्मिक नेत्याचा फोटो सापडला. चौकशीत हे लोक पाकिस्तानचे असून चेन्नईत अटक केलेले लोक त्यांचे नातेवाईक असल्याचं पुढे आले. आरोपी राशिद अली सिद्दिकी कराचीतील लियाकतबादचा रहिवासी आहे. तो त्याच्या पत्नीसह आई वडिलांसोबत मिळून हिंदू बनून भारतात राहत होता. २०११ साली आयशाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाखत झाली. लग्नावेळी तिचं कुटुंब बांगलादेशात राहायचे. पाकिस्तानी धार्मिक नेत्यांकडून छळ झाल्यानंतर तो पत्नीसह बांगलादेशात राहायला गेला होता. आरोपींना त्यांच्या खर्चासाठी मेहंदी फाऊंडेशनकडून पैसे मिळायचे. हे फाऊंडेशन भारतासह जगभरात सक्रीय आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतBangladeshबांगलादेश