शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

संकेतस्थळांवर राज्यभरातून दिवसाला सरासरी दोन तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 05:40 IST

सायबर गुन्ह्यांत वाढ होत असताना अनेक जण केवळ बदनामीच्या भीतीने तर, काही जण पोलीस ठाण्याच्या चकरा नको म्हणून तक्रारीसाठी पुढे येत नाहीत.

मनीषा म्हात्रे मुंबई : सायबर गुन्ह्यांत वाढ होत असताना अनेक जण केवळ बदनामीच्या भीतीने तर, काही जण पोलीस ठाण्याच्या चकरा नको म्हणून तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. मात्र, नागरिक अनभिज्ञ असल्याने राज्यभरातून दिवसाला २ किंवा ३ तक्रारी या संकेतस्थळावर येत आहेत.नागरिकांना तक्रारी करणे सोयीस्कर व्हावे म्हणून शासनासह, सायबर पोलिसांकडून तीन संकेतस्थळांबरोबर हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.केंद्र सरकारकडून २०१७मध्ये सायबर गुन्हे नोंद करण्यासाठी https://cybercrime.gov.in हे संकेतस्थळ सुरू झाले. सुरुवातीला ते केवळ महिला आणि बालकांच्या तक्रारींसाठी होते. आॅगस्ट २०१९पासून ते सर्वांसाठी खुले झाले. यात, आतापर्यंत अडीच हजारांच्या आसपास तक्रारी आल्या आहेत.जुलै २०१८ पासून www.reportphishing.in हे संकेतस्थळ महाराष्ट्र सायबर पोलिसांनीे सुरू केले. यात बँकिंग किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती विचारणारे कोणतेही फसवे संदेश, ईमेल, फोन कॉल्स प्राप्त झाल्यास तक्रार करता येईल. तसेच मोबाइल चोरी किंवा हरवल्यास मोबाइलचा आयएमईआय क्रमांक ब्लॉक करण्यासाठी  www.ceir.gov.in  या संकेतस्थळावर तक्रार करू शकतात. सायबर पोलीस फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करत आहेत. मात्र अजूनही नागरिक या संकेतस्थळापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे येत तक्रार करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.>घरबसल्या करू शकता तक्रारअनेकदा बदनामी, सायबर साक्षरतेच्या अभावामुळे तक्रारदार पुढे येत नाही. त्यामुळे गुन्हेगारही मोकाट राहतो. अशा वेळी सर्वांनीच सायबर सुरक्षेबाबत काळजी घ्यावी. त्यात, फसव्या कॉलबाबत समजताच, अथवा यात अडकले असल्याने घरबसल्याही संकेस्थळाच्या माध्यमातून आपण तक्रार नोंदवू शकता.- बलसिंग राजपूत, अधीक्षक, सायबर महाराष्ट्रआपल्या मोबाइलचा १५ अंकी आयएमईआय क्रमांक *#06# डायल करून नोंद करून ठेवा. जेणेकरून भविष्यात मोबाइल हरवल्यास याद्वारे त्याचा शोध घेण्यास मदत ठरू शकते. महिला आणि बालकांसाठी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींकरिता हेल्पलाइन क्रमांक - १५५२६० हा आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम