शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पत्नी सोडून गेल्याने शेजाऱ्यांवर हल्ला; तिघे ठार, ग्रँट रोड येथील गजबजलेल्या भागात हत्येचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 07:56 IST

पार्वती मॅन्शन या रहिवासी इमारतीत राहणारा हल्लेखोर चेतन गाला (५४) यास डीबी मार्ग पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

मुंबई : पत्नीसह कुटुंब सोडून जाण्यास शेजारीच जबाबदार असल्याचा रागातून ग्रँट रोडमध्ये एका व्यक्तीने शुक्रवारी शेजारी राहणाऱ्या पाचजणांवर चाकूने सपासप वार केले, त्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नायर आणि रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पार्वती मॅन्शन या रहिवासी इमारतीत राहणारा हल्लेखोर चेतन गाला (५४) यास डीबी मार्ग पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. हल्ल्यात जयेंद्रभाई मिस्त्री (७७), इलाबाई मिस्त्री (७०) आणि जेनील ब्रह्मभट्ट (१८) यांचा मृत्यू झाला असून, स्नेहल ब्रह्मभट्ट (४६) आणि प्रकाश वाघमारे (५४) यांची प्रकृती गंभीर आहे.

चेतन हा पत्नी, तीन मुली आणि एक मुलासोबत राहत होता. त्याचे कपड्याचे दुकान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो घरीच होता. यातूनच दोन महिन्यांपूर्वी त्याचा पत्नीसोबत वाद झाला. रागात पत्नी, मुलासह सासऱ्याच्या घरी राहण्यास गेली. शुक्रवारी दुपारी मुलगी जेवणाचा डबा देऊन घरी गेली. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास रागाच्या भरात मिस्त्री दाम्पत्यावर गाला याने चाकूने वार केले.    

चाकूने केले सपासप वारवाटेत येणाऱ्या प्रत्येकांवर त्याचा हल्ला सुरू होता. चेतनने जेनीलच्या गळ्यावर तर स्नेहल यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले. त्याच रक्ताच्या थारोळ्यात त्यांनी पहिल्या मजल्यावर धाव घेतली. शेजारच्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविले. दिवसाढवळ्या या गजबजलेल्या भागात हत्येचा हा थरार सुरू हाेता.

हत्येपूर्वी मुलाशी संपर्कघटनेच्या काही वेळापूर्वी गाला याने मुलाला फोन करून आईसह घरी येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी येणार नाही असे सांगितल्याने त्याच्या रागात भर पडली आणि शेजारच्यामुळे पत्नी, कुटुंब दुरावल्याच्या रागात त्याने चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती त्याच्या चौकशीतून समोर आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी