शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ड्रग्ज तस्करांची पाच कोटींची मालमत्ता जप्त; सक्तवसुली संचालनालयाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 05:46 IST

शेराजी याने मुंबई, भारतासह अनेक देशांत २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  तब्बल २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुंतलेला व दाऊदचा हस्तक मानल्या जाणाऱ्या असगर अली शेराजी व त्याच्या साथीदारांची एकूण ५ कोटी ३७ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) शुक्रवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेत फ्लॅट, दुकाने, भूखंड अशा एकूण सात मालमत्तांचा समावेश आहे. याखेरीज विविध बँक खात्यांमध्ये असलेली ३६ लाख ८१ हजार रुपयांची मुदत ठेवही जप्त करण्यात आली आहे. 

शेराजी याने मुंबई, भारतासह अनेक देशांत २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, यूके आणि युरोपातील काही देशांत अमली पदार्थ पाठवले होते. तो दुबई येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांनी त्याला गेल्यावर्षी मे महिन्यात अटक केली होती. त्याच्याविरोधात मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. 

  अमली पदार्थांच्या तस्करीद्वारे मिळालेला पैसा त्याने पदेशातून फिरवून परत भारतात आणल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सर्वप्रथम मुंबईतील जोगेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

  ईडीने आजवर केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेराजी व त्याच्या साथीदारांनी परदेशात अमली पदार्थ पाठविण्याची माहिती मिळावी, याकरिता कॉल सेंटर तयार केले होते. 

  परदेशातून या कॉल सेंटरवर त्यांना ऑर्डर मिळत असे. ऑर्डर परदेशात पाठविण्यासाठी त्याने भारतात बनावट औषधनिर्मिती कंपन्या उभ्या केल्या. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयDrugsअमली पदार्थ