शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

आसिफ खान यांची हत्याच; वाशिमच्या माजी जि. प. अध्यक्षासह तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:11 IST

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आसिफ खान मुस्तफा खान यांची वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाज्योती अनिल गणेशपुरे, त्यांचा पुत्र वैभव गणेशपुरे व त्याचा मावसभाऊ स्वप्निल वानखडे या तिघांनी गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली.

ठळक मुद्देज्योती गणेशपुरे व त्यांचा मुलगा वैभव गणेशपुरे व स्वप्निल वानखडे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.ज्योती गणेशपुरे व आसिफ खान या दोघांमध्ये संपत्ती व आर्थिक बाबीवरून वाद सुरू झाले होते.ज्योती गणेशपुरे हिने आसिफ खान यांना १६ आॅगस्टच्या रात्री मूर्तिजापूर येथील बहिणीच्या घरी बोलावले. त्यानंतर गळा आवळून हत्या केली.

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आसिफ खान मुस्तफा खान यांची वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान महिला व बालकल्याण सभापती ज्योती अनिल गणेशपुरे, त्यांचा पुत्र वैभव गणेशपुरे व त्याचा मावसभाऊ स्वप्निल वानखडे या तिघांनी गळा आवळून हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक कैलास नागरे यांनी दिली. गणेशपुरे हिने आसिफ खान यांना घरी बोलावून त्यांची हत्या करताना त्यांच्यात झटापट झाली असता, यामध्ये ज्योती यांच्या गालावर धारदार शस्त्राचा वार झाला, तर त्यांचा मुलगाही या झटापटीत जखमी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आसिफ खान १६ आॅगस्ट रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मुलगा डॉ. सोहेल खान याने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, त्यांचे अपहरण झाल्याचे निश्चित होताच सोमवारी पाच जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, याच दरम्यान ज्योती गणेशपुरे व त्यांचा मुलगा वैभव गणेशपुरे व स्वप्निल वानखडे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. सोमवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या तिघांचीही चौकशी केली असता त्यांनी कबुली देताच स्थानिक गुन्हे शाखेने तीनही आरोपींना अटक केली. या प्रकरणात आणखी दोन ते तीन आरोपींचा समावेश असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. ज्योती गणेशपुरे व आसिफ खान या दोघांमध्ये संपत्ती व आर्थिक बाबीवरून वाद सुरू झाले होते. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर ज्योती गणेशपुरे हिने आसिफ खान यांना १६ आॅगस्टच्या रात्री मूर्तिजापूर येथील बहिणीच्या घरी बोलावले. त्यानंतर संगनमताने खान यांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर एम एच ३७ ए १५८७ क्रमांकाच्या वाहनातून आसीफ खान यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी सदर वाहनात मृतदेह टाकून म्हैसांग येथील पूर्णा नदीपात्रात फेकल्याची कुबली पोलिसांना दिली आहे. तीन दिवसांपासून मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे, मात्र घटनेच्या रात्री नदीला प्रचंड पूर असल्याने मृतदेह दूरवर वाहून गेल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात लवकरच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून, अटक केलेल्या तीनही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाºयांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून