शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

आसिफ खान हत्याकांड; मृतदेह न आढळताही दाखल होऊ शकतो हत्येचा गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:52 IST

मृतदेह आढळला नसला तरीही संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावा व आरोपींच्या कबुलीजबाबावरून हत्येचा गुन्हा दाखल क रून न्यायालयात खटला चालविता येऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली.

ठळक मुद्दे मूर्तिजापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध घातपाताच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला.मात्र मृतदेहच आढळत नसल्याने पोलिसांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.आरोपींचा कबुलीजबाब आणि संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावे गोळा करताच पोलिसांना या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करता येतो.

- सचिन राऊतअकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान मुस्तफा खान अपहरण प्रकरणानंतर त्यांची हत्या झाल्याची अकोला पोलिसांना खात्री पटताच तसेच आरोपींच्या कबुलीजबाबावरून खान यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले; मात्र त्यांच्या अपहरणाला सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह आढळला नसल्यामुळे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही; परंतु मृतदेह आढळला नसला तरीही संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावा व आरोपींच्या कबुलीजबाबावरून हत्येचा गुन्हा दाखल क रून न्यायालयात खटला चालविता येऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली.वाडेगाव येथील रहिवासी आसीफ खान हे १६ आॅगस्ट रोजी रात्री मूर्तिजापूर येथे ज्योती गणेशपुरे यांच्या बहिणीकडे गेले होते. ज्योतीने बोलाविल्यानंतर आसीफ खान तिथे गेल्याचे पोलीस तपासात समोर येताच मूर्तिजापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध घातपाताच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला; मात्र मृतदेह पूर्णा नदी पात्रात फेकल्यानंतर सहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. विविध पथकांसह पोलिसांद्वारे या मृतदेहाची शोधमोहीम सुरू आहे; मात्र मृतदेहच आढळत नसल्याने पोलिसांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. असे असले तरीही आरोपींचा कबुलीजबाब आणि संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावे गोळा करताच पोलिसांना या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करता येतो, अशी माहिती सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली. ठोस पुरावे गोळा करताच हा खटला न्यायालयातही तेवढ्याच ताकदीने चालविण्यात येतो, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आता या तपासात अकोला पोलिसांचा चांगलाच कस लागणार असून, त्यांच्या तपासावरच या खटल्याचे भविष्य अवलंबून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून