शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आसिफ खान हत्याकांड; मृतदेह न आढळताही दाखल होऊ शकतो हत्येचा गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:52 IST

मृतदेह आढळला नसला तरीही संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावा व आरोपींच्या कबुलीजबाबावरून हत्येचा गुन्हा दाखल क रून न्यायालयात खटला चालविता येऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली.

ठळक मुद्दे मूर्तिजापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध घातपाताच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला.मात्र मृतदेहच आढळत नसल्याने पोलिसांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.आरोपींचा कबुलीजबाब आणि संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावे गोळा करताच पोलिसांना या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करता येतो.

- सचिन राऊतअकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान मुस्तफा खान अपहरण प्रकरणानंतर त्यांची हत्या झाल्याची अकोला पोलिसांना खात्री पटताच तसेच आरोपींच्या कबुलीजबाबावरून खान यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले; मात्र त्यांच्या अपहरणाला सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह आढळला नसल्यामुळे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही; परंतु मृतदेह आढळला नसला तरीही संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावा व आरोपींच्या कबुलीजबाबावरून हत्येचा गुन्हा दाखल क रून न्यायालयात खटला चालविता येऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली.वाडेगाव येथील रहिवासी आसीफ खान हे १६ आॅगस्ट रोजी रात्री मूर्तिजापूर येथे ज्योती गणेशपुरे यांच्या बहिणीकडे गेले होते. ज्योतीने बोलाविल्यानंतर आसीफ खान तिथे गेल्याचे पोलीस तपासात समोर येताच मूर्तिजापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध घातपाताच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला; मात्र मृतदेह पूर्णा नदी पात्रात फेकल्यानंतर सहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. विविध पथकांसह पोलिसांद्वारे या मृतदेहाची शोधमोहीम सुरू आहे; मात्र मृतदेहच आढळत नसल्याने पोलिसांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. असे असले तरीही आरोपींचा कबुलीजबाब आणि संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावे गोळा करताच पोलिसांना या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करता येतो, अशी माहिती सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली. ठोस पुरावे गोळा करताच हा खटला न्यायालयातही तेवढ्याच ताकदीने चालविण्यात येतो, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आता या तपासात अकोला पोलिसांचा चांगलाच कस लागणार असून, त्यांच्या तपासावरच या खटल्याचे भविष्य अवलंबून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून