शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:35 IST

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते म्हणून अश्विनीने आदित्य आणि त्या मुलीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही.

सोलापूर - अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदार यांच्या एकत्र आत्महत्येच्या घटनेला अश्विनीची आणि त्याच्या जीवलग मित्राची ताटातूट, त्याचे दुसऱ्या युवतीशी निर्माण झालेले स्नेह, नंतर सर्वच अन्य मित्रांनी तोडलेले संबंध ही पार्श्वभूमी आहे. अश्विनीने नैराश्यातून आत्महत्या करण्याचं ठरवले. त्यामुळे आधीच घरातील नातेसंबंधाची गोपनीय भावनिक माहिती समजल्यामुळे कमालीचा निराश झालेल्या रोहितनेही तिच्याबरोबरच एकाच स्कार्फला गळफास घेऊन जीवन संपवले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

खरेतर शाळेपासूनचे सहा मित्र आणि त्यांच्या मैत्रिणीची ही गोष्ट...त्यातील रोहित अन् अश्विनी एकमेकांना भाऊ बहीण मानत होते. रोहितचा जवळचा मित्र आदित्य होता, तो अश्विनीचा जीवलग मित्र बनला पण दीड वर्षापासून अश्विनीची तिच्या जीवलग मित्रापासून ताटातूट झाली. त्याच दरम्यान आदित्यला जीवलग मैत्रिण मिळाली. रोहितचा दुसरा मित्र राज यालाही एक मैत्रिण होती. आदित्यचा दुरावा अश्विनीला सहन होत नव्हता. यामुळे ती त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे बोलण्यासाठी प्रयत्न करत होती. यासाठी प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते म्हणून अश्विनीने आदित्य आणि त्या मुलीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही.

वारंवार मित्र मैत्रिणींमध्ये भांडण होत असल्याने ग्रुपमधील सहा जणांनी ८ जून रोजी रुपाभवानी मंदिर परिसरात बैठक घेतली. या बैठकीत भांडणाचे मूळ कारण अश्विनीच असल्याचे कळालं, त्यानंतर ग्रुपमधील चार जणांनी रोहित आणि अश्विनीचा मोबाईल ब्लॉक केला अन् संबंध तोडून टाकले. यामुळे रोहित आणि अश्विनी कमालीचे तणावात गेले होते. जीवलगाबरोबरच्या मैत्रीत आलेला दुरावा अन् नंतर सर्व मित्रांनी तोडलेले संबंध यामुळे अश्विनीने थेट आत्महत्या करण्याचे ठरवले. रोहित हा कर्णिकनगरमधील एका घरामध्ये असताना अश्विनी तिथे आली. तिने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी रोहितला आपल्या कुटुंबातील नातेसंबंधाबाबत काही ठाऊक नसलेली भावनिक माहिती कळाली. त्यामुळे तो आधीच तणावात होता. त्यानंतर मित्रांनी संबंध तोडून दिल्याने तणाव आणखी वाढला होता. याचवेळी अश्विनीने आणि रोहितने एकाच स्कार्फला गळफास घेत स्वत:ला संपवले. 

माझ्या भांगेत कुंकू भर

आत्महत्येपूर्वी अश्विनीने लिहलेल्या चिठ्ठीत तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव आहे. हे तू ओळखायला हवे होते, यामुळे मी गेल्यावर माझ्या भांगेत तू कुंकू भर असे अश्विनीनं चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

चौघांचा जबाब नोंदविला

रोहित अन् अश्विनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या चार मित्र मैत्रिणींचा जबाब -नोदविला आहे. उद्या मयतांना आई -वडिलांना बोलावून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली. दरम्यान रोहितवर दुपारी रूपाभवानी हिंदू स्मशानभूमीत; तर अश्विनीवर रूद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांचे पालक अन् नातेवाईकांनी आक्रोश केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी