शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:54 IST

१३ दिवस बेपत्ता असलेल्या अर्चना तिवारीला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होताना दिसतो. ती कुणाला नजरही मिळवत नव्हती

भोपाळ - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथे सापडलेली अर्चना तिवारी हिला पोलिसांनी कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. अर्चना तिवारीवर कुठलाही फौजदारी गुन्हा नोंद केला नाही. अर्चनाचे काका तिला घेऊन जाण्यासाठी आले होते. त्यावेळी काकाचा हातात हात पकडून अर्चना त्यांच्या बाजूला उभी होती. तिच्याबाबत उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नावर तिने मौन बाळगले होते. १३ दिवसांनी अर्चना तिवारी सापडली होती. घरात लग्नाचा तगादा लावल्याने त्यापासून सुटका व्हावी म्हणून अर्चनाने बेपत्ता होण्याचा प्लॅन रचला होता. 

अर्चना तिवारी १३ दिवसांनी लखीमपूर इथल्या नेपाळ बॉर्डरवर सापडली. लग्नापासून वाचण्यासाठी मित्राच्या मदतीने ती काठमांडूला पळाली होती. मला लग्न करायचं नाही म्हणून घरातून पळाल्याचं तिने पोलिसांना सांगितले. बुधवारी पोलिसांच्या पथकाने अर्चना तिवारीला भोपाळला आणले. त्यानंतर या प्रकरणावर माध्यमांसमोर पोलिसांनी खुलासा केला. अर्चनाला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतर आता कुटुंब तिला घेऊन कटनीला गेले आहे. अर्चनाला घेऊन जाण्यासाठी तिचे काका आले होते. कुटुंबाकडे जातानाचा अर्चना तिवारीचे फोटो समोर आले आहेत. 

१३ दिवस बेपत्ता असलेल्या अर्चना तिवारीला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होताना दिसतो. ती कुणाला नजरही मिळवत नव्हती. मोठ्या काकाच्या बाजूला ती उभी होती. काकाचा हात हातात घेऊन ती घाबरलेल्या अवस्थेत होती. तिची नजर खालीच होती. तिने कुणालाही पाहिले नाही. अर्चना तिवारीला लग्न करायचे नव्हते परंतु कुटुंबाने एका मुलासोबत तिचे लग्न ठरवले होते. इंदूरहून पॅकअप करून आता घरी ये असं कुटुंबाने तिला सांगितले होते. मात्र लग्नाऐवजी अर्चनाला तिचे करिअर बनवायचे होते. त्यामुळेच तिने हे मोठे पाऊल उचलले. याआधीही अर्चना तिवारीने घरच्यांनी आणलेली ५ लग्नाची स्थळे नाकारल्याचं समोर आले आहे.

पोलिसांसमोर उभं राहिलं होतं आव्हान

दरम्यान, चालत्या ट्रेनमधून अर्चना तिवारी बेपत्ता झाल्याने तिचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. अर्चना इटारसीहून शुजालपूर, इंदूर, हैदराबाद, जोधपूर, दिल्ली आणि तिथून उत्तर प्रदेशच्या नेपाळ सीमेतून काठमांडूला पोहचली होती. तिची बॅग ट्रेनच्या बी ३ कोचमध्ये सापडली होती. त्यानंतर ८ ऑगस्टला तिच्या भावाने कटनी येथील रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. इतकेच नाही तर एनडीआरएफ जवानांना घेऊन बुधनीपर्यंत जंगलात सर्च मोहिम हाती घेतली. नर्मदा नदी ३२ किमीवर भाग शोधून काढला. त्यानंतर अर्चनाच्या एका कॉलमुळे महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिस