शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

अनुराग कश्यपच्या अडचणीत होणार वाढ, मुंबई पोलीस पाठवणार समन्स 

By पूनम अपराज | Updated: September 29, 2020 17:42 IST

पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलीस लवकरच अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवणार आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री रामदास आठवले पायल घोषच्या लढाईत आवाज उठवत आहेत. आठवले यांनी मुंबई पोलिसांना अनुराग कश्यप यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

लैंगिक शोषणाच्या आरोपाचा सामना करत असलेल्या बॉलिवूडमधील दिग्दर्शक अनुराग कश्यपला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. अभिनेत्री पायल घोषनेअनुराग कश्यपविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाबद्दल गुन्हा दाखल केला होता. पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलीस लवकरच अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवणार आहेत.केंद्रीय मंत्री रामदास आठवले पायल घोषच्या लढाईत आवाज उठवत आहेत. आठवले यांनी मुंबई पोलिसांना अनुराग कश्यप यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर मुंबई पोलिसांनी लवकरच अनुराग कश्यपला अटक केली नाही तर ते धरणे आंदोलनाला बसतील. दरम्यान, आता पोलिस अनुराग कश्यप यांना समन्स पाठवून चौकशी करणार असल्याची बातमी आता समोर आली आहे. पायल घोष अनेक दिवसांपासून न्यायाची मागणी करत होती. पायल घोष हिने इशारा दिला होता की, जर तिला न्याय मिळाला नाही तर ती उपोषणाला बसणार आहे. दिग्दर्शकाला अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. तसेच आज पायल आपल्या वकिलांसोबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेटली असून तिने न्यायासाठी राज्यपालांची भेट घेतली आहे. 

 

पायलचे आरोप अनुराग कश्यप यांनी फेटाळले. त्याने ट्विट करुन आपला मुद्दा मांडला. त्याने लिहिले की, , मला शांत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी इतका वेळ घ्यावा लागला. चला, काही नाही. मला गप्प बसवताना एक महिला असूनही तिने देखील एका महिलेचा आधार घेतला. थोडीतरी मर्यादा पाळा मॅडम,  फक्त असे म्हणेन की तुमचे सर्व आरोप निराधार आहेत,  अशी माहिती अमर उजालाने दिली आहे. 

टॅग्स :Anurag Kashyapअनुराग कश्यपPoliceपोलिसMumbaiमुंबईbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीpayal ghoshपायल घोष