शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांवरील अवमान याचिकेवर उत्तर द्या; कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 02:26 IST

ख्वाजा युनूसची आई असिया बेगम यांनी २३ जून रोजी परमवीर सिंग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.

मुंबई : ख्वाजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणी खटला सुरू असलेल्या चार पोलिसांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतल्याबद्दल मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले.

ख्वाजा युनूसची आई असिया बेगम यांनी २३ जून रोजी परमवीर सिंग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे याचिकेत म्हटले आहे. २००४ मध्ये उच्च न्यायालयाने चार आरोपी पोलिसांना सेवेत रुजू न करून घेण्याचे आदेश सरकारला दिले होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, हवालदार राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांच्यावर ख्वाजा युनूसची हत्या व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. या चौघांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली नसल्याचे याचिकेत नमूद आहे. न्या. ए.ए. सय्यद व न्या. एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगून दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवली आहे.‘अमिताभ गुप्तांवरही कारवाई करावी’सिंग यांच्याबरोबरच गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावरही कारवाईची मागणी असिया बेगम यांनी केली. २ डिसेंबर २००२ रोजी घाटकोपर बॉम्बस्फोटप्रकरणी ख्वाजा युनूससह तिघांना अटक झाली. ६ जानेवारी २००३ रोजी तो अखेरचा दिसला, त्यानंतर बेपत्ता झाला. तो फरार झाल्याचा पोलिसांचा दावा आहे, तर पोलिसांनीच त्याची हत्या करून पुरावे नष्ट केल्याचा दावा त्याच्या आई असिया बेगम यांनी केला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस