शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लग्न लावून अर्थिक फसवणुकीचा राधानगरी तालुक्यात आणखी एक गुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 22:48 IST

प्रवीण राजाराम बोरनाक यांनी ही फिर्याद दिली आहे. 

राधानगरी- राधानगरी तालुक्यातील धामोड येथील दोघांची अगोदर लग्न झालेल्या मुलींशी लग्ने  लावून पाच लाख सत्तर हजाराची   फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वधू सह  नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे म्हासुर्ली पैकी जोगमवाडी  इथली घटना ताजी असतानाच हा प्रकार उघड झाल्याने राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.  प्रवीण राजाराम बोरनाक यांनी ही फिर्याद दिली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण बोरनाक आणि श्रीकांत ज्ञानदेव जाधव यांनी लग्ने जुळवण्यासाठी मध्यस्थांची मदत घेतली. छाया प्रकाश दामुगडे रा. घानवडे ता.करवीर,संध्या विजय स्वप्रेकर रा. सांगली, पांडुरंग कदम रा. चिकोडी जि.बेळगाव, प्रियंका राजू जाधव रा.मुंबई,  चेतन प्रल्हाद गायकवाड रा.सोलापूर, पंकज श्रावण भालेराव रा.सोलापूर, मेघा राजाराम मुळेद रा. सांगली,या मध्यस्थानी प्रवीण याचे पूनम कुमार जीवने रा.चिकोडी जि. बेळगाव हिच्याशी व श्रीकांत याचे अश्विनी श्रावण भालेराव रा.सोलापूर यांच्याशी  लग्न जुळवून दिले. नोव्हेंबर महिन्यात ही लग्ने धामोड येथे पार पडली. 

या दोन्ही मुलींची अगोदर लग्ने झाली असतानाही  माहिती लपवून विवाह लावून दिला.यासाठी प्रवीण यांच्याकडून  रोख रक्कम आणि सोन्याचांदीच्या दागिन्यासह  तीन लाख नव्वद हजार रुपये . व श्रीकांत याच्याकडून रोख व सोने असे एक लाख ऐंशी  हजार  रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रवीण बोरनाक यांनी आज वरील  नऊ जणांवर राधानगरी पोलिसात तक्रार दिली आहे.  पोलीस उपनिरीक्षक व्ही एन घाडगे,बजरंग पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी