शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अनिक्षाला २४ मार्च, तर अनिल जयसिंघानीला २७ मार्चपर्यंत कोठडी, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 06:02 IST

पोलिसांनी अनिल जयसिंघानीला सोमवारी गुजरातमधून अटक केली होती.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा व ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला २७ मार्च, तर त्याची मुलगी व फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला २४ मार्चपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी अनिल जयसिंघानीला सोमवारी गुजरातमधून अटक केली होती. त्याला व त्याची मुलगी अनिक्षाला मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. अनिक्षा उत्तरे देण्यास टाळत आहे. योग्य माहिती देत नाही, अशी माहिती मुख्य सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, न्यायालयाने आता काय शिल्लक आहे, अशी विचारणा देसाई यांना केली.

फडणवीसांना अडकविण्याचा प्रयत्नबुकी अनिल जयसिंघानी याचा ताबा मागताना देसाई यांनी म्हटले की, सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या पत्नीद्वारे अडकविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी अमृता यांच्याकडून १० कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी ३ वेगवेगळे फोन वापरण्यात आले. 

नातेवाइकांच्या नावावर करायचा रूम बुक...अनिल जयसिंघानी पाठोपाठ त्याला लपविण्यात मदत करणारा नातेवाईक, जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जयसिंघानीला गुजरातमधून ताब्यात घेतले, त्यावेळी तो त्याच्यासोबत होता. चौकशीअंती त्याचा सहभाग उघड होताच त्याच्यावर मंगळवारी अटकेची कारवाई करण्यात आली. निर्मलने अनिलला लपण्यात मदत केली आणि त्याला लॉजिस्टिक सपोर्टही केला. निर्मलच्या नावाने तो हॉटेलमध्ये रूम बुक करायचा. निर्मलने अनिल जयसिंघानीला कशी मदत केली? याबाबत त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

सरकारी वकील काय म्हणाले?अनिल आणि अनिक्षा या दोघांना समोरासमोर बसवून माहिती योग्य आहे की नाही, हे तपासायचे आहे. एक मोबाईल नंबर आहे. तो कोणाचा आहे, हे आम्हाला माहिती आहे. फक्त त्याबाबत खात्री करून घ्यायची आहे. तपासात प्रगती आहे. मात्र, दोघांकडून आणखी माहिती घ्यायची आहे, असे देसाई यांनी न्यायालयाला सांगितले. 

 १९८४ पासून आरोपीला पोलिस संरक्षण देण्यात आले. तेव्हा सरकारची मेहरनजर होती. जेव्हा लोक आरोपीविरोधात गेली तेव्हा तो खलनायक ठरला. आरोपीला बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. आरोपीचा चुलत भाऊ त्याच्याबरोबर होता म्हणून त्यालाही अटक करण्यात आली आहे, असा युक्तिवाद जयसिंघानी यांचे वकील वीरेंद्र खन्ना यांनी न्यायालयात केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी