शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:24 IST

मृतक शेतकऱ्याचे नाव चंद्रमा यादव होते. किरकोळ भांडणानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण..

एका क्षुल्लक वादातून माणसाचा जीव घेतला जाऊ शकतो, याचा प्रत्यय बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात आला आहे. समोशाच्या पैशांवरून सुरू झालेल्या एका वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी हा वाद मिटला होता, पण दुसऱ्या दिवशी आरोपींनी पुन्हा भांडण उकरून काढत या शेतकऱ्याला संपवले. ही धक्कादायक घटना चौरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलोडिहरी गावात घडली आहे.

किरकोळ वादातून मोठा गुन्हा

मृतक शेतकऱ्याचे नाव चंद्रमा यादव होते. किरकोळ भांडणानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीर आणि डोक्यावर तलवारीच्या हल्ल्याच्या गंभीर जखमा होत्या. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमका वाद काय होता?

मृतक चंद्रमा यादव यांचे मेहुणे देवमुनी सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी चंद्रमा यादव यांचा नातू गावातील आशा देवी नावाच्या महिलेच्या दुकानात समोसा खरेदी करायला गेला होता. तेथे एका समोशाच्या पैशांवरून नातू आणि दुकानमालक महिला यांच्यात किरकोळ वाद झाला. शनिवारी सायंकाळी हा वाद कसातरी मिटला होता. मात्र, रविवारी सकाळी चंद्रमा यादव हे पुन्हा आशा देवीच्या दुकानाजवळ गेले असता, हा जुना वाद पुन्हा उफाळून आला आणि दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली.

तलवारीचा वार आणि उपचारादरम्यान मृत्यू

मारामारी सुरू असतानाच आरोपींनी आपल्या हातात असलेल्या तलवारीने चंद्रमा यादव यांच्या डोक्यावर वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना आरा सदर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी पाटणा येथे रेफर केले. उपचारादरम्यान, सोमवारी रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह गावात आणला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतक शेतकऱ्याच्या मेहुण्याने आशा देवी आणि तिच्या मुलांना या हत्येसाठी जबाबदार धरले आहे. चौरी पोलीस ठाण्याचे प्रमुख जयराम शुक्ला यांनी सांगितले की, १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी झालेल्या मारहाणीत जखमी झाल्यामुळेच यादव यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Samosa Dispute Escalates: Farmer Killed Over Petty Argument in Bihar

Web Summary : A 65-year-old farmer in Bihar was brutally murdered after a dispute over samosa money escalated. The argument, initially resolved, reignited the next day, leading to a fatal sword attack. Police have registered a case against six accused.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश