शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

"सूनेला दुसऱ्या कोणासोबत तरी...", मानव शर्माला दिलेली धमकी; वडिलांनी मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:05 IST

कुटुंबीयांचा आरोप आहे की, मानवचा मानसिक छळ केला जात होता.

आग्रा येथील टीसीएस मॅनेजर मानव शर्मा याच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मानवचा मानसिक छळ केला जात होता. आत्महत्या करण्यापूर्वी मानवने एक व्हिडीओ बनवला होता ज्यामध्ये त्याने अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मानवचे वडील एअरफोर्समधून रिटायर्ड झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, सुनेला दुसऱ्या कोणासोबत तरी राहायचं होतं आणि तिने कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली होती.

२४ फेब्रुवारी रोजी २८ वर्षीय मानव शर्माने व्हिडीओ बनवून आत्महत्या केली. मानव शर्मा मुंबईतील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. आत्महत्या करण्यापूर्वी, मानवने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीने केलेल्या छळाबद्दल सांगितलं.

व्हिडिओमध्ये मानव रडत रडत म्हणतो की, सॉरी मम्मी, सॉरी पापा, मी जात आहे. पुरुषही खूप एकटे असतात, कोणीतरी त्यांचाही विचार करायला हवा... मी आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता मला ते सहन होत नाही. व्हिडिओमध्ये मानवने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत.

मानवचे वडील नरेंद्र शर्मा यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाचं लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी बरहन येथे झाले. लग्नानंतर सून मानवसोबत मुंबईला गेली. काही दिवस सगळं ठीक होतं, पण नंतर भांडणं वाढू लागली. ती दररोज भांडू लागली आणि कुटुंबाला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देऊ लागली. त्याने सांगितलं की, सून तिच्या एका मित्रासोबत राहू इच्छित होती.

मानवच्या बहिणीने आज तक आणि इंडिया टुडेला सांगितलं की, तिच्या भावाच्या आत्महत्येचे कारण केवळ त्याच्या तिच्या वहिनीचे प्रेमसंबंध नव्हते तर घटस्फोटाचे गुंतागुंतीचे कायदेशीर पैलू देखील होते. जानेवारी २०२५ मध्ये माझ्या भावाला समजलं की वहिनीचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत.

एका महिलेने मानवला याबद्दल माहिती दिली होती. जेव्हा मानवला हे सर्व कळले तेव्हा त्याने त्याच वेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर, मानवचे पालक मुंबईला गेले आणि त्यांनी दोघांनाही ही बाब समजावून सांगितली. मग परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण जेव्हा मानवला कळलं की घटस्फोट घेणे सोपे नाही, तेव्हा तो तणावात आला.

२३ फेब्रुवारी २०२५ रोजी मानव आणि त्याची पत्नी मुंबईहून आग्र्याला आले. दुसऱ्या दिवशी घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी त्यांना वकिलाला भेटायचं होतं, पण मानवच्या पत्नीने मानवला तिच्या पालकांच्या घरी बोलावलं. तिथे, सासरच्यांनी मानवला धमकावले आणि घटस्फोट घेणं सोपं होणार नाही असं सांगितलं. वडील नरेंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मानव आपल्या पत्नीला सोडायला गेला तेव्हा त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला तिथे धमकावलं. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता त्याने गळफास घेतला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी