शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

"सूनेला दुसऱ्या कोणासोबत तरी...", मानव शर्माला दिलेली धमकी; वडिलांनी मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:05 IST

कुटुंबीयांचा आरोप आहे की, मानवचा मानसिक छळ केला जात होता.

आग्रा येथील टीसीएस मॅनेजर मानव शर्मा याच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मानवचा मानसिक छळ केला जात होता. आत्महत्या करण्यापूर्वी मानवने एक व्हिडीओ बनवला होता ज्यामध्ये त्याने अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मानवचे वडील एअरफोर्समधून रिटायर्ड झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, सुनेला दुसऱ्या कोणासोबत तरी राहायचं होतं आणि तिने कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली होती.

२४ फेब्रुवारी रोजी २८ वर्षीय मानव शर्माने व्हिडीओ बनवून आत्महत्या केली. मानव शर्मा मुंबईतील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. आत्महत्या करण्यापूर्वी, मानवने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीने केलेल्या छळाबद्दल सांगितलं.

व्हिडिओमध्ये मानव रडत रडत म्हणतो की, सॉरी मम्मी, सॉरी पापा, मी जात आहे. पुरुषही खूप एकटे असतात, कोणीतरी त्यांचाही विचार करायला हवा... मी आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता मला ते सहन होत नाही. व्हिडिओमध्ये मानवने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत.

मानवचे वडील नरेंद्र शर्मा यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाचं लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी बरहन येथे झाले. लग्नानंतर सून मानवसोबत मुंबईला गेली. काही दिवस सगळं ठीक होतं, पण नंतर भांडणं वाढू लागली. ती दररोज भांडू लागली आणि कुटुंबाला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देऊ लागली. त्याने सांगितलं की, सून तिच्या एका मित्रासोबत राहू इच्छित होती.

मानवच्या बहिणीने आज तक आणि इंडिया टुडेला सांगितलं की, तिच्या भावाच्या आत्महत्येचे कारण केवळ त्याच्या तिच्या वहिनीचे प्रेमसंबंध नव्हते तर घटस्फोटाचे गुंतागुंतीचे कायदेशीर पैलू देखील होते. जानेवारी २०२५ मध्ये माझ्या भावाला समजलं की वहिनीचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत.

एका महिलेने मानवला याबद्दल माहिती दिली होती. जेव्हा मानवला हे सर्व कळले तेव्हा त्याने त्याच वेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर, मानवचे पालक मुंबईला गेले आणि त्यांनी दोघांनाही ही बाब समजावून सांगितली. मग परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण जेव्हा मानवला कळलं की घटस्फोट घेणे सोपे नाही, तेव्हा तो तणावात आला.

२३ फेब्रुवारी २०२५ रोजी मानव आणि त्याची पत्नी मुंबईहून आग्र्याला आले. दुसऱ्या दिवशी घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी त्यांना वकिलाला भेटायचं होतं, पण मानवच्या पत्नीने मानवला तिच्या पालकांच्या घरी बोलावलं. तिथे, सासरच्यांनी मानवला धमकावले आणि घटस्फोट घेणं सोपं होणार नाही असं सांगितलं. वडील नरेंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मानव आपल्या पत्नीला सोडायला गेला तेव्हा त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला तिथे धमकावलं. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता त्याने गळफास घेतला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी