शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"सूनेला दुसऱ्या कोणासोबत तरी...", मानव शर्माला दिलेली धमकी; वडिलांनी मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:05 IST

कुटुंबीयांचा आरोप आहे की, मानवचा मानसिक छळ केला जात होता.

आग्रा येथील टीसीएस मॅनेजर मानव शर्मा याच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मानवचा मानसिक छळ केला जात होता. आत्महत्या करण्यापूर्वी मानवने एक व्हिडीओ बनवला होता ज्यामध्ये त्याने अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मानवचे वडील एअरफोर्समधून रिटायर्ड झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, सुनेला दुसऱ्या कोणासोबत तरी राहायचं होतं आणि तिने कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली होती.

२४ फेब्रुवारी रोजी २८ वर्षीय मानव शर्माने व्हिडीओ बनवून आत्महत्या केली. मानव शर्मा मुंबईतील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. आत्महत्या करण्यापूर्वी, मानवने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीने केलेल्या छळाबद्दल सांगितलं.

व्हिडिओमध्ये मानव रडत रडत म्हणतो की, सॉरी मम्मी, सॉरी पापा, मी जात आहे. पुरुषही खूप एकटे असतात, कोणीतरी त्यांचाही विचार करायला हवा... मी आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता मला ते सहन होत नाही. व्हिडिओमध्ये मानवने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत.

मानवचे वडील नरेंद्र शर्मा यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाचं लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी बरहन येथे झाले. लग्नानंतर सून मानवसोबत मुंबईला गेली. काही दिवस सगळं ठीक होतं, पण नंतर भांडणं वाढू लागली. ती दररोज भांडू लागली आणि कुटुंबाला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देऊ लागली. त्याने सांगितलं की, सून तिच्या एका मित्रासोबत राहू इच्छित होती.

मानवच्या बहिणीने आज तक आणि इंडिया टुडेला सांगितलं की, तिच्या भावाच्या आत्महत्येचे कारण केवळ त्याच्या तिच्या वहिनीचे प्रेमसंबंध नव्हते तर घटस्फोटाचे गुंतागुंतीचे कायदेशीर पैलू देखील होते. जानेवारी २०२५ मध्ये माझ्या भावाला समजलं की वहिनीचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत.

एका महिलेने मानवला याबद्दल माहिती दिली होती. जेव्हा मानवला हे सर्व कळले तेव्हा त्याने त्याच वेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर, मानवचे पालक मुंबईला गेले आणि त्यांनी दोघांनाही ही बाब समजावून सांगितली. मग परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण जेव्हा मानवला कळलं की घटस्फोट घेणे सोपे नाही, तेव्हा तो तणावात आला.

२३ फेब्रुवारी २०२५ रोजी मानव आणि त्याची पत्नी मुंबईहून आग्र्याला आले. दुसऱ्या दिवशी घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी त्यांना वकिलाला भेटायचं होतं, पण मानवच्या पत्नीने मानवला तिच्या पालकांच्या घरी बोलावलं. तिथे, सासरच्यांनी मानवला धमकावले आणि घटस्फोट घेणं सोपं होणार नाही असं सांगितलं. वडील नरेंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मानव आपल्या पत्नीला सोडायला गेला तेव्हा त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला तिथे धमकावलं. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता त्याने गळफास घेतला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी