शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:40 IST

Raja-Sonam Case: मेघालय पोलिसांच्या चौकशीत सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह हाच हत्येच्या कटाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. सोनम या हत्याकांडाचा भाग होती.

इंदूर - व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनत चालले आहे. या प्रकरणात राजाची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचे कोडेही उलगडले आहे परंतु अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे सातत्याने या प्रकरणात नवनवीन हैराण करणारे खुलासे समोर येत आहेत. आता राजाची पत्नी सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने नवं रहस्य उलगडले आहे. राजाच्या हत्येनंतर हे दोघे अशा महिलेची हत्या करण्याची तयारी करत होते, ज्याबाबत पोलिसांची दिशाभूल करण्यात येत आहे. हे दोघे कुठल्याही एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळणार होते, जेणेकरून ही सोनम असल्याचं पोलिसांना वाटेल हे तपासात उघड झाले.

मेघालय पोलिसांच्या चौकशीत सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह हाच हत्येच्या कटाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. सोनम या हत्याकांडाचा भाग होती. सोनमच्या चौकशीआधीच तिचा बॉयफ्रेंड राज आणि इतर तीन आरोपींना सोनम बुरखा घालून मेघालयातून पळाली होती हे उघड केले. टॅक्सी, बस आणि ट्रेनसारख्या माध्यमांचा वापर करून ती मध्यप्रदेशच्या इंदूर येथे पोहचली होती. राजाची मेघालयात हत्या करण्याचे षडयंत्र सोनमने ११ मे च्या लग्नानंतर केले. हा प्लॅन राजचा होता, सोनम त्यासाठी तयार झाली होती. या हत्येतील आरोपी हे राजचे मित्र होते, हत्येत सुपारी देण्याचा अँगल नाही असं पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी सांगितले. परंतु प्लॅनिंग हत्येचे होते, राजने त्याच्या ३ मित्रांसोबत आणि सोनमच्या मदतीने हे सगळे केले. 

राजाच्या हत्येसाठी बनवले होते २ प्लॅन

माहितीनुसार, राजने हत्येसाठी त्याच्या मित्रांना ५० हजार खर्चासाठी पाठवले होते. राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी २ प्लॅन बनवण्यात आले होते. पहिला प्लॅन सेल्फी घेताना राजाला धक्का मारून दरीत ढकलण्याचा होता. जर ते फेल झाले तर प्लॅन बी तयार केला होता. त्यात आधी राजाला मारून टाकायचे मग त्याचा मृतदेह दरीत फेकायचा. पहिला प्लॅन फेल झाला तेव्हा आरोपींनी प्लॅन बी नुसार राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला.

दरम्यान, प्लॅनिंगनुसार राज कुशवाहचे मित्र आकाश राजपूत, विशाल ठाकूर आणि आनंद कुर्मी हे तिघे गुवाहाटीला आधीच पोहचले होते. गुवाहाटीत राजाच्या हत्येचे प्लॅनिंग केले होते परंतु त्यात यश आले नाही. त्यानंतर शिलांग आणि मावलाखियात गावाजवळ २ वेळा राजाला मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळीही हल्लेखोर अयशस्वी ठरले. त्यानंतर २३ मे दुपारी २ वाजता सावडोंग फॉल्सजवळ राजा रघुवंशीची हत्या केली. तिन्ही हल्लेखोरांनी पाळीपाळीने राजावर हल्ला केला. आकाशने रक्ताने माखलेला टीशर्ट फेकून दिला आणि सोनमचा रेनकोट घातला. मेघालयातील कोर्टाने सर्व पाच आरोपींना ८ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास केला असता राज आणि सोनम सातत्याने संपर्कात असल्याचे पुढे आले. कॉल डिटेल्समधून समोर आले की, १६ मे ते २३ मे या काळात या दोघांमध्ये ३० हून अधिक वेळा बोलणे झाले. ज्यात रात्री उशिरापर्यंत आणि मेसेजवरही बोलणे होत होते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी