शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:40 IST

Raja-Sonam Case: मेघालय पोलिसांच्या चौकशीत सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह हाच हत्येच्या कटाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. सोनम या हत्याकांडाचा भाग होती.

इंदूर - व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनत चालले आहे. या प्रकरणात राजाची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचे कोडेही उलगडले आहे परंतु अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे सातत्याने या प्रकरणात नवनवीन हैराण करणारे खुलासे समोर येत आहेत. आता राजाची पत्नी सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने नवं रहस्य उलगडले आहे. राजाच्या हत्येनंतर हे दोघे अशा महिलेची हत्या करण्याची तयारी करत होते, ज्याबाबत पोलिसांची दिशाभूल करण्यात येत आहे. हे दोघे कुठल्याही एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळणार होते, जेणेकरून ही सोनम असल्याचं पोलिसांना वाटेल हे तपासात उघड झाले.

मेघालय पोलिसांच्या चौकशीत सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह हाच हत्येच्या कटाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. सोनम या हत्याकांडाचा भाग होती. सोनमच्या चौकशीआधीच तिचा बॉयफ्रेंड राज आणि इतर तीन आरोपींना सोनम बुरखा घालून मेघालयातून पळाली होती हे उघड केले. टॅक्सी, बस आणि ट्रेनसारख्या माध्यमांचा वापर करून ती मध्यप्रदेशच्या इंदूर येथे पोहचली होती. राजाची मेघालयात हत्या करण्याचे षडयंत्र सोनमने ११ मे च्या लग्नानंतर केले. हा प्लॅन राजचा होता, सोनम त्यासाठी तयार झाली होती. या हत्येतील आरोपी हे राजचे मित्र होते, हत्येत सुपारी देण्याचा अँगल नाही असं पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी सांगितले. परंतु प्लॅनिंग हत्येचे होते, राजने त्याच्या ३ मित्रांसोबत आणि सोनमच्या मदतीने हे सगळे केले. 

राजाच्या हत्येसाठी बनवले होते २ प्लॅन

माहितीनुसार, राजने हत्येसाठी त्याच्या मित्रांना ५० हजार खर्चासाठी पाठवले होते. राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी २ प्लॅन बनवण्यात आले होते. पहिला प्लॅन सेल्फी घेताना राजाला धक्का मारून दरीत ढकलण्याचा होता. जर ते फेल झाले तर प्लॅन बी तयार केला होता. त्यात आधी राजाला मारून टाकायचे मग त्याचा मृतदेह दरीत फेकायचा. पहिला प्लॅन फेल झाला तेव्हा आरोपींनी प्लॅन बी नुसार राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला.

दरम्यान, प्लॅनिंगनुसार राज कुशवाहचे मित्र आकाश राजपूत, विशाल ठाकूर आणि आनंद कुर्मी हे तिघे गुवाहाटीला आधीच पोहचले होते. गुवाहाटीत राजाच्या हत्येचे प्लॅनिंग केले होते परंतु त्यात यश आले नाही. त्यानंतर शिलांग आणि मावलाखियात गावाजवळ २ वेळा राजाला मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळीही हल्लेखोर अयशस्वी ठरले. त्यानंतर २३ मे दुपारी २ वाजता सावडोंग फॉल्सजवळ राजा रघुवंशीची हत्या केली. तिन्ही हल्लेखोरांनी पाळीपाळीने राजावर हल्ला केला. आकाशने रक्ताने माखलेला टीशर्ट फेकून दिला आणि सोनमचा रेनकोट घातला. मेघालयातील कोर्टाने सर्व पाच आरोपींना ८ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास केला असता राज आणि सोनम सातत्याने संपर्कात असल्याचे पुढे आले. कॉल डिटेल्समधून समोर आले की, १६ मे ते २३ मे या काळात या दोघांमध्ये ३० हून अधिक वेळा बोलणे झाले. ज्यात रात्री उशिरापर्यंत आणि मेसेजवरही बोलणे होत होते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी